शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हरदोली ग्रामपंचायतीने उभारली वेशीवर तटबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा बंद करणे सुरु केले आहे. हरदोली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाशी दोन हात : ग्राम संरक्षक दलाची स्थापना, गावात येणाऱ्यांची केली जाते नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना भंडारा जिल्हा कोरोना मुक्त आहे. तो कोरोनामुक्तच राहावा यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहे. आता त्याला गावकरीही साथ देत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली ग्रामपंचायतीने तर गावच्या वेशीवर तटबंदी उभारली आहे. गावात येणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा दलासमोर हजेरी घेतली जाते. महानगरातून येणाºया अनोळखी व्यक्तींना गावात बंदी घालण्यात आली आहे.नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा बंद करणे सुरु केले आहे. हरदोली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे. सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या मार्गदर्शनात २३ युवक या सुरक्षा दलात सहभागी झाले आहेत. कोविड-१९ ग्राम संरक्षण दल असे नाव ठेवले आहे. समितीत अध्यक्ष, सरपंच, सचिव, पोलीस पाटील, निमंत्रक म्हणून ग्रामसेवक आणि २६ सदस्य आहेत.गावात शिरण्यासाठी चार रस्ते आहेत. त्यातील एक रस्ता नागपूरकडून येतो. त्या चारही ठिकाणी सुरक्षा रक्षक आळीपाळीने कडा पहारा देत असतात. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करुन नोंद घेतली जाते. बाहेरुन येणाऱ्यांवर नियंत्रण राहावे, गावात विणाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर अंकुश लावावा, गावात गर्दी कमी व्हावी आदी उपाययोजना केल्या जातात. या सर्व सर्वांवर देखरेख सरपंच सदाशिव ढेंगे, पोलीस पाटील पंढरीनाथ झंझाड, ग्रामसेवक गोपाल बुरडे आदी करीत आहेत. लॉकडाऊनपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहेत.परप्रांतीयांना वाहनातून दिले सोडूनमध्यप्रदेशातील अनेक मजूर औरंगाबादमधून पायी आपल्या गावाकडे जात होते. हरदोलीवरुन जात असताना हा प्रकार सुरक्षा दलाच्या लक्षात आला. त्यांनी या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून अन्नधान्याची किट देण्यात आली. या सर्वांना एका वाहनाने तुमसर येथे सोडून देण्यात आले.बाहेरुन माणसे कुठून येतात. याची माहिती व्हावी, तसेच गावात कोरोनाचा संशयित शिरु नये म्हणून उपाययोजना करण्यात आली. गावच्या चारही वेशीवर ग्रामरक्षक ठेवण्यात आले आहे.-सदाशिव ढेंगे, सरपंच हरदोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या