शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील बाजारपेठेत ‘हापूस’ आंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:35 IST

फळांचा राजा आंबा भंडारा जिल्ह्यात पोहोचला आहे. कडक उन्हात रसांच्या आंब्याची मागणी वाढली आहे. डझनाने विकणारा महागडा हापूस बीटीबीत आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचीही पसंती : दरदिवशी आठ टन आब्यांची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : फळांचा राजा आंबा भंडारा जिल्ह्यात पोहोचला आहे. कडक उन्हात रसांच्या आंब्याची मागणी वाढली आहे. डझनाने विकणारा महागडा हापूस बीटीबीत आला आहे.नैसर्गिकरित्या विषमुक्त आंबा बीटीबीत मिळत असल्याने दररोज आठ टन एवढा आंबा विकत आहे. देशभरात आंब्याला मोठी मागणी आहे. फळांचा राजा म्हणून ज्याचा सन्मान आहे.तो आंबा सामान्यांना आता सामान्य दरात बीटीबीतून उपलब्ध होत असल्याने दैनंदिन आंब्याची विक्री जोमात वाढली आहे. रत्नागिरीतून हापूस कच्च्या स्वरुपात येऊन दोन दिवसात नैसर्गिक प्रक्रियेने पकवून ग्राहकांना विकला जात आहे.एप्रिलच्या मध्यापासून भंडारा जिल्ह्यातील आंबा विक्रीला उपलब्ध झाला असला तरी दर मात्र सामान्यांच्या पचनी पडत नव्हते. पण जिल्ह्यातील शेतकरी उघड्यावर येऊ नये म्हणून जिल्ह्यातील आंबा जिल्ह्यातच विकून शेतकºयांना अधिकतम दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बीटीबीतून करण्यात आला.जिल्ह्यातला आंबा कमी झाल्याने कोकणातून (रत्नागिरी) कानपूर (उत्तरप्रदेश) इथून दररोज आंब्याचे ट्रक बीटीबीत येत असून भंडारावासीयांना उत्तम आंब्याची चव चाखायला मिळत आहे.आंब्यात विविध जाती असल्या तरी हापूस, दसेरी, लंगडा, केसर, लालबाग यासारखी आंबे बीटीबीत दाखल झाली आहेत.यात हापूस ६० रु., दसेरी ४० रु., लंगडा ४० रुपये, केसर ५० रुपये, लालबाग ३० रुप. प्रती किलोें विकत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याना लोणच्याकरिता आंबा २.२५ किलो दराने विकत आहे.भंडारा जिल्ह्यात आंब्याला मोठी मागणी आहे. विषमुक्त आंबा म्हणजे अमृतच असते. जिल्ह्यातील आठवडी बाजारात आंबा विकला जात आहे. पण तो विषमुक्त आहे का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अन्न व औषधी प्रशासन जागे नसल्याने विषयुक्त आंबा गरीबांच्या माथी मारले जात आहे का? हाही प्रश्न तितकाच महत्वाचा असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भाजीपाल्याची शेती जशी समाधानाने फुलत असून जिल्हाबाहेर मागणी वाढली. त्याचप्रकारे शेतकऱ्यांनी फळांची शेती फुलवावी. जेणे करून आर्थिक उन्नती साधायला अडचण राहणार नाही. यावर्षी पपईचा बाग फुलविला आहे.-बंडू बारापात्रे,अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा