शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीतील कुणबी समाजात जन्म घेऊन धन्य झालो

By admin | Updated: November 23, 2015 00:37 IST

आपल्या पूर्वजांनी दिलेली ओळख व सध्याची समाज व्यवस्था आपण सर्वजण पुढे रेटत आहोत. भारतीय संविधानात या समाजाच्या उत्कर्षासाठी जी तरतूद करण्यात आली आहे ...

नाना पटोले यांचे प्रतिपादन : खेडुले कुणबी समाज मेळाव्यात गुणवंत, नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार लाखांदूर : आपल्या पूर्वजांनी दिलेली ओळख व सध्याची समाज व्यवस्था आपण सर्वजण पुढे रेटत आहोत. भारतीय संविधानात या समाजाच्या उत्कर्षासाठी जी तरतूद करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत समाजबांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना कर्तव्य समजले पाहिजे. असे सांगून कुणबी समाजात जन्म घेऊन धन्य झालो, अशी कृतज्ञता खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.लाखांदूर येथे रविवारला अखिल खेडुले कुणबी समाजाच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर साकोलीचे आमदार बाळा काशिवार, प्रा.संजय कुथे, रामभाऊ दिवटे, रामकृष्ण ठेंगडी, अभय शिंगाडे, ईश्वर घोरमोडे, मुख्याध्यापक संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक पारधी, जिल्हा परीषद सदस्य प्रदीप बुराडे, सभापती मंगला बगमारे, वासुदेव तोंडरे, रामचंद्र राऊत, ताराचंद मातेरे उपस्थित होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, देशातील प्रत्येक प्रांतात कुणबी समाज आहे. देशात ७५ खासदार कुणबी समाजाचे आहेत. ७ खासदार तेली समाजाचे आहेत. ज्या समाजाचे सात खासदार त्यांचा पंतप्रधान झाला. मात्र ७५ खासदारांचे केवळ दोन मंत्री झाल्याची व्यथा मांडली. पिढ्यानपिढ्यांपासून मागासलेल्या ओबीसीतील कुणबी समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास व्हावा, म्हणून भारतीय संविधानात तरतूद आहे. मात्र राज्यकर्त्यांनी ७० टक्के समाज असून आवश्यक अंमलबजावणी केली नाही. ६८ वर्षांपासून हा समाज विकासापासून कोसो दूर ठेवण्याचे काम या देशातील मुठभर लोकांनी केल्याचा आरोप केला. या समाजातील प्रत्येकजण शिक्षित होऊन दिशा व दशा समजण्यापूर्वीच बहुजन समाजात तेढ निर्माण करून मुठभर लोक मोठी झाली. अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे लढा दिला पाहिजे. दरम्यान या समाजाचा मागासलेपणा दूर करावयाचा असेल तर संघटीतपणे वाटा बलुतेदार समाज व्यवस्था झुगारणे काळाची गरज असल्याचे म्हटले. मुठभर लोकांच्या दडपशाही धोरणाला बळी पडलेल्या या समाजाचे स्वतंत्र मंत्रालयाची मागणी अनेक वर्षापासून रेटत आहे. ही लढाई ओबीसीतील कुणबी समाजापुरती न राहता बहुजनांची लढाई झाली पाहिजे असे आवाहनही केले. यावेळी खा.पटोलेंच्या हस्ते तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्यांचा समाजातर्फे सत्कार केला. संचालन रामचंद्र राऊत यांनी केले. या मेळाव्याला महिला पुरुष उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)