शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

यंत्राने हिरावली मजुरांच्या हातची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे.

ठळक मुद्देशेती व्यवसाय संकटात : केवळ पेरणी व कोळपणीसाठी बैलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाच-सहा वर्षांपासून सालगगड्यांचे पगार वाढल्याने व शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नाही. त्यामुळे बळीराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही. ‘हायटेक’ शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले तरी इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी मुटाकुटीला आला आहे.कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे. तसेच शेती कसण्यासाठी लागणाºया बैलजोडीचे दर वाढलेले आहेत. तसेच मजुरीने न उरकणारी कामे, दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. तर काही शेतकरी बैलजोडी असूनही मोजकी कामे बैलाद्वारे उरकून उर्वरित कामासाठी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. बळीराजा शेतातील कामांबरोबर शेणखत घालणे आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करताना दिसून येत आहेत. तसेच खरीप व रबी हंगामातही पेरणीसाठी ट्रॅक्टरचा प्रयोग करताना दिसून येत आहे. केवळ पेरणी व कोळपणीसाठी बैलांचा वापर केला जात आहे.परंतु यंदा गारपिटीमुळे चाºयाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाल्याने पशुधन कसे जोपासावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. धान्याच्या राशीसाठी ट्रॅक्टरवरील मळणीयंत्रे, किटक नाशकाची फवारणी ही ट्रॅक्टरवर पाण्याची टाकी ठेवून केली जात आहे. बैलगाडीच्या सहाय्याने मजूर लावून अथवा सालगडी ठेवून शेताची मशागत करताना येणारा खर्च व ट्रॅक्टरच्या सहाय्याने येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ घातल्यास ट्रॅक्टरचा वापर परवडणारा आहे. परिणामी ट्रॅक्टरवाल्यांना रोजगार मिळत असला तरी इतर मजुरांचे हात रिकामेच आहे.सध्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मशागतीचे कााम चांगले होते. तेच काम बैलाच्या सहाय्याने केल्यास कामास उशिर लागतो. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केलेली शेती महत्वाची असली तरी त्यामुळे रोजगार कमी झाल्याने बेरोजगारांचे हात वाढले आहेत.अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेतीची चांगली मशागत होते. त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने केलेल्या कामाचे पैसे त्यांच्या सोयीने घ्यावे लागतात.

टॅग्स :agricultureशेती