शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पावसाअभावी हातचे धानाचे पीक गेले

By admin | Updated: November 3, 2014 23:20 IST

या परिसरातील गोसे बुज गोसीखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा परिसरात शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी धानाच्या पिकाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. जवळपास अर्ध्या पेक्षाही

गोसे (बु.) : या परिसरातील गोसे बुज गोसीखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा परिसरात शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी धानाच्या पिकाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. जवळपास अर्ध्या पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरीही अर्ध्यापेक्षा जास्त नुकसान होवूनही या परिसराची नजरअंदाज आणेवारी ७० ते ७५ टक्केपर्यंत दाखविण्यात आली आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. सुरुवातीला एक महिना बिना पावसाचा गेला. एक महिन्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी केली. पण धानाचे पीक अंतिम टप्प्यात असताना एका पावसाची अत्यंत गरज होती.ज्या शेतकऱ्यांच्या शेतीजवळ तलाव, नदी, नाले व इतर जलस्त्रोत होते त्यामधून धानाच्या पिकाला सिंचन करून आपले धानाचे पीक वाचविले. पण ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सुविधा नव्हती त्या शेतकऱ्यांचे धानाचे उभे पिक डोळ्यासमोर वाळत होते. पण याला काहीही उपाय नसल्यामुळे ही पिकाची स्थिती पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेतात या धानाच्या पिकाचे रुपांतर तणसीत झाले होते. या परिसरातील अर्धे अधिक धानाचे पिक एक पावसाने गेले आहे. या शेतकऱ्यांनी सावकार, बचत गट, वित्तीय संस्था, बँक आदींकडून शेतीकरिता कर्ज काढले होते. पण या वर्षी त्यातील व्याजाचे पीक गेल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. या शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)