शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कोरोनाच्या संकटात भाजीपाल्याला अर्ध्यावरच दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

पालांदूर : गत २० दिवसांपासून कोरोनाचे संकट अतिशय भयानक जाणवत आहे. प्रत्येक व्यक्ती जीव सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना शेतकरी राजा ...

पालांदूर : गत २० दिवसांपासून कोरोनाचे संकट अतिशय भयानक जाणवत आहे. प्रत्येक व्यक्ती जीव सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना शेतकरी राजा मात्र शेतात राबत आहे. घामाचा रक्त करीत सर्वांच्या भोजना करीता परिश्रम घेत आहे. परंतु त्याच्या घामाला अपेक्षित दाम मात्र मिळत नाही. भाजीपाल्यांचे दर बाजारपेठाअभावी अर्ध्यावरच आलेले आहे.

गतवर्षी सुद्धा या महिन्यात लाॅकडाऊन लागलेला होता. शेतकऱ्याचे आर्थिक अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कळीत झालेली सर्वांनीच अनुभवलेली होते. तीच परिस्थिती तीच अगतिकता आजही शेतकऱ्याच्या नशिबी आलेली आहे. महागाईने कहर केलेला असताना शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव अपेक्षित मिळत नाही. बाजारपेठा बंद असल्याने छोट्या-मोठ्या गुजरी कोरोनाच्या दहशतीत सुरू आहेत. ग्राहक नसल्याने मालाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे मिळेल तो भाव स्वीकारत शेतकरी राजा भाजीपाला पडक्या भावात विकत आहे.

लांब पल्ल्याची बाजारपेठा बंद असल्याने स्थानिक ठिकाणी भाजीपाल्याचे विक्री मंदावलेली आहे. शेतकऱ्याकडून कोरोनाचे संकट दूर करण्याकरिता रुग्णांना ताजा भाजीपाला पुरविला जातो. हिरव्या भाज्या सुद्धा अत्यल्प दरात विकल्या जात आहे.

कोट

नवरात्र उत्सवातही मागणी नाही. हिंदू संस्कृतीप्रमाणे नवरात्र उत्सव सुरू आहे. शाकाहारीत वाढ अपेक्षित आहे. तरीसुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नाही.

मोहन लांजेवार, भाजीपाला उत्पादक, पालांदूर

मागणी कमी असल्याने दर पडलेले आहेत. बाजारपेठेत ग्राहकच कमी झाल्याने व्यवहारात स्पर्धा नाही. लांब पल्ल्याच्या किंवा मोठ्या बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. जसा ग्राहक मिळेल त्या पद्धतीत भाजीपाला विकून मोकळा होणे सुरू आहे. शेतकऱ्याच्या घामाला निश्चितच अपेक्षित दाम सध्या तरी दुर्लभ झाले आहे.

बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी असोसिएशन, भंडारा