शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे भंडारा शहर अंधारात

By admin | Updated: June 11, 2014 23:08 IST

मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना

वीज कंपनीविरूध्द आक्रोश : नागरिकांनी काढली रात्र उकाड्यात भंडारा : मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना रात्र अक्षरक्ष: उकाड्यात काढावी लागली. एकीकडे ऊन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असताना वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागला. दुपारी ५ वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी १२ वाजतापर्यंत बंदच होता. वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून काही वेळात वीज पुरवठा सुरळीत होईल, या हेतूने वाट पाहत राहिले. त्यानंतर तक्रार नोंदवूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. तक्रार नोंदणी केंद्र बेपत्तावीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदणी कार्यालयात (२५२३५५) या क्रमांकावर संपर्क साधला असता तिथे संपर्क झाला नाही. हे कार्यालय कुठे असे विचारले असता, वीज कंपनीचे अधिकारी पांडे महालात हे कार्यालय असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी पांडे महाल गाठले असता तिथे कार्यालय नसल्याचे समोर आहे. अधिक शोध घेतला असता एका गल्लीबोळात हे कार्यालय दिसून आले. तिथे तक्रार नोंदविल्यानंतर लाईनमन पाठवितो, एवढेच उत्तर कर्मचाऱ्याने दिले.त्यानंतर उपविभागीय अभियंता अमित परांजपे यांना ६००७, ६००८, ६००९, ६०१० यांना या खांबावरून वीज पुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यांनी कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क साधण्यासाठी सांगितले. कनिष्ठ अभियंत्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागपूर मुख्यालयातील मुख्य अभियंता कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांच्याशी संपर्क साधून विजेची समस्या सांगावी लागली. वीज गेली तर वीज ग्राहकांचे समाधान करणारी यंत्रणा वीज वितरण विभागाकडे नाही.उपविभागीय अभियंता प्रसाद रेशमे हे भंडाऱ्यात असताना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जी यंत्रणा उभारली होती, ती सर्व यंत्रणा अलिकडच्या काळात कोलमडून पडली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.चार दिवसांपूर्वी कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड आल्यानंतर गडेगाव उपकेंद्रातून पाच फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भंडारा व लाखनी तालुक्यातील ३२५ गावातील नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली़ वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिक हैरान झाले असून असा प्रकार वारंवार होत असल्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)