शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

निम्मे भंडारा शहर अंधारात

By admin | Updated: June 11, 2014 23:08 IST

मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना

वीज कंपनीविरूध्द आक्रोश : नागरिकांनी काढली रात्र उकाड्यात भंडारा : मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना रात्र अक्षरक्ष: उकाड्यात काढावी लागली. एकीकडे ऊन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असताना वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागला. दुपारी ५ वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी १२ वाजतापर्यंत बंदच होता. वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून काही वेळात वीज पुरवठा सुरळीत होईल, या हेतूने वाट पाहत राहिले. त्यानंतर तक्रार नोंदवूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. तक्रार नोंदणी केंद्र बेपत्तावीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदणी कार्यालयात (२५२३५५) या क्रमांकावर संपर्क साधला असता तिथे संपर्क झाला नाही. हे कार्यालय कुठे असे विचारले असता, वीज कंपनीचे अधिकारी पांडे महालात हे कार्यालय असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी पांडे महाल गाठले असता तिथे कार्यालय नसल्याचे समोर आहे. अधिक शोध घेतला असता एका गल्लीबोळात हे कार्यालय दिसून आले. तिथे तक्रार नोंदविल्यानंतर लाईनमन पाठवितो, एवढेच उत्तर कर्मचाऱ्याने दिले.त्यानंतर उपविभागीय अभियंता अमित परांजपे यांना ६००७, ६००८, ६००९, ६०१० यांना या खांबावरून वीज पुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यांनी कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क साधण्यासाठी सांगितले. कनिष्ठ अभियंत्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागपूर मुख्यालयातील मुख्य अभियंता कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांच्याशी संपर्क साधून विजेची समस्या सांगावी लागली. वीज गेली तर वीज ग्राहकांचे समाधान करणारी यंत्रणा वीज वितरण विभागाकडे नाही.उपविभागीय अभियंता प्रसाद रेशमे हे भंडाऱ्यात असताना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जी यंत्रणा उभारली होती, ती सर्व यंत्रणा अलिकडच्या काळात कोलमडून पडली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.चार दिवसांपूर्वी कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड आल्यानंतर गडेगाव उपकेंद्रातून पाच फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भंडारा व लाखनी तालुक्यातील ३२५ गावातील नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली़ वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिक हैरान झाले असून असा प्रकार वारंवार होत असल्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)