शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

हलबा समाज बांधवांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:44 IST

आदिवासी हलबा समाजावरील अन्याय दूर करावा, हलबा कर्मचाºयांना नोकरीमध्ये संरक्षण देऊन जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात यासह अन्य मागण्यांना घेवून ....

ठळक मुद्देतहसील कार्यालयात गर्दी : घोषणांनी परिसर दुमदुमला

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : आदिवासी हलबा समाजावरील अन्याय दूर करावा, हलबा कर्मचाºयांना नोकरीमध्ये संरक्षण देऊन जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात यासह अन्य मागण्यांना घेवून पवनी तहसिल कार्यालयावर हलबा समाजबांधवांनी मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन तसेच क्रांतीची मशाल पेटवून करण्यात आली. यावेळेस 'कोष्टी आमरो धंदा आहा, जात आमरी हलबा आहा' ही घोषणा देण्यात आली.तहसिल कार्यालयाचे प्रांगणात मोर्चा धडकताच मोर्चाचे रुपांतर सभेत होवून त्यात अनेक हलबा समाजातील नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यात हलबा, हलबी जमातीला डॉ. बाबासाहेबांनी दिलेले घटनात्मक आरक्षण आज धोक्यात आले असून हलबा जमातीवर अन्याय होत आहे. असल्याचे सांगून मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूकपूर्ण काळामध्ये नागपूर येथील प्रचारसभेमध्ये राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता आल्यास हलबा समाजाला त्यांचे संवैधानिक अधिकार मिळवून देवू अशी हमी दिली होती. सरकारला तीन वर्षाचा कालवधी पूर्ण होवूनही सरकार हलबा समाजाचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात उदासिन आहे. त्यामुळेच हलबा समाजाला आंदोलनाचा हत्यार उपसावे लागले आहे, असे मत मोर्चाचे नेतृत्व करणारे अनिल धकाते यांनी व्यक्त केले.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परिस्थिती पाहता महाराष्टÑ शासनाने स्वत:चे विशेषधिकाराचा वापर करुन कोणत्याही हलबा-हलबी जमातीतील बांधवावर कार्यवाही करु नये. भारतीय संविधानाचा अनुच्छेद १६१ मध्ये नमुद राज्यपालांना अधिकार दिलेला असून त्यानुसार हलबा, हलबी जमातीच्या कर्मचाºयांना नोकरीत या अनुच्छेदानुसार अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल यांनी महाराष्टÑ शासनाने शिफारस करावी, ज्या हलबा, हलबी, अनुसूचित जमातीच्या कर्मचाºयांना सेवा जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे संपूष्टात आणण्यात आली.त्यांना भारीय संविधानाच्या अनुच्छेद १६/२ नुसार सेवेत सामावून घेण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावे, अनुसूचित जमाती पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेले हलबा हलबी जमात पडताळणी प्रकरण शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत निकाली काढू नये, शासनाचे अंतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, मंडळे, महामंडळे, शैक्षणिक संस्था, विद्यापिठ व इतर कार्यालयाने हलबा हलबी जमातीचे प्रकरणात राज्यपाल व महाराष्टÑ शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही कर्मचारी व विद्यार्थ्यांवर कारवाई करु नये, हलबा-हलबी जमातीचे प्रमाणपत्र देतांना, प्रमाणपत्र वैध ठरविताना १९५० च्या आधीचे पुरावे मागणीचे आग्रह करु नये, रक्ताच्या नात्यातील उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत आदिवासी विकास विभागाने त्वरित शासन निर्णय काढावे, जात पडताळणी समिती ही नियमबाह्य कार्य करीत असल्यामुळे त्याचा अनुसूचित जमातीच्या लोकावर अन्याय होत असून जात पडताळणी तपासणी समिती त्वरित बरखास्त करावी किंवा समिती ही आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत न ठेवता स्वतंत्र न्यायसंस्था असावी, जात पडताळणी समितीची सबीबीआय चौकशी करण्यात यावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना तहसिलदार पवनी यांच्यामार्फत देण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व अनिल धकाते, अरविंद आसई यांनी केले. यावेळी राष्टÑीय जमात महामंडळचे संस्थापक उदय धकाते, संजय हेडाऊ, अभय धकाते, शाम सोनकुसळे, सोनकुसरे, प्रशांत सिलेकर, गजानन सोरते, मागासवर्गीय कृती समिती भंडाराचे अध्यक्ष खुशाल निमजे, दुर्वास धार्मिक, आशिष पात्रे, योगेश हेडाऊ, पवनीचे माजी नगराध्यक्ष र.चि. पिपरे, किशोर गोटाफोडे यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.