शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

वादळी पावसासह गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:29 IST

▪ पिंपळगाव को परिसरातील शेतकरी संकटात लाखांदूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार गत १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक तालुक्यातील ...

▪ पिंपळगाव को परिसरातील शेतकरी संकटात

लाखांदूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार गत १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक तालुक्यातील काही भागांत झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने २०० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धानपीक नष्ट झाले आहे. सदर नुकसान तालुक्यातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव परिसरात झाल्याची विश्वसनीय माहिती असून उन्हाळी धान उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडल्याची ओरड आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. सदर क्षेत्रात अर्धे अधिक क्षेत्र ईटियाहोह धरणांतर्गत तर उर्वरित क्षेत्र कृषी वीजपंप सुविधेंतर्गत सिंचित करून धानाची लागवड करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर लागवडीअंतर्गत धानाचा मोठ्या प्रमाणात निसवा होऊन धानाच्या लोंबी भरण्याच्या मार्गावर असताना, तर काही धानपीक कापणीला आले असताना अचानक झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने उभ्या धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. १ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव को परिसरातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव आदी गावांतील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील धानपीक पूर्णत: नष्ट झाले आहे.

नुकसानग्रस्त भागातील शेतातील धानाच्या लोंबीची धानबियाणे अक्षरश: जमिनीवर गारपिटीने गळून पडल्याने शेतात केवळ धानाची तणस शिल्लक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, खरिपात पूर, अवकाळी पाऊस व किडरोगाने लागवडीखालील पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने सदरची हानी उन्हाळी हंगामात भरून काढण्याच्या उमेदीत शेतकरी असताना १ मे रोजी झालेल्या गारपिटीने हातात आलेले धानपीक नैसर्गिक आपत्तीने हिसकावल्याचे बोलले जात आहे.

बॉक्स :

भाजीपाला पिकासह आंब्याचे नुकसान

१ मे रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी पावसासह गारपिटीने तालुक्यातील पिंपळगाव को क्षेत्रात २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान होताना भाजीपाला पिकासह आंबा या फळाचेदेखील नुकसान झाले आहे. ऐन उतरणीला आलेल्या आंब्याच्या फळावर गारपीट व वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात फळे गळून पडली असून शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे.

जिवंत तारांसहित विद्युतखांब कोसळले

तालुक्यातील पिंपळगाव को येथे १ मे रोजी वादळी पावसासह गारपीट झाल्याने स्थानिक पिंपळगाव टोली येथील जिवंत तारांसहित विद्युतखांब खाली कोसळले. मात्र, वीजप्रवाह खंडित झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तालुका कृषी विभागांतर्गत क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण

१ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव को परिसरातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव आदी गावांत वादळी पावसासह गारपीट होऊन भाजीपाला पिकासह उन्हाळी धानपिकाच्या झालेल्या नुकसानीची तालुका कृषी विभागांतर्गत क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी केली नुकसानभरपाईची मागणी

गारपीट व वादळी पावसामुळे पिंपळगाव को क्षेत्रातील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.