शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नहराच्या पाण्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: June 26, 2016 00:27 IST

पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील शेतशिवारामध्ये गोसेखुर्दचा उजवा कालवा आहे.

कोदुर्ली : पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील शेतशिवारामध्ये गोसेखुर्दचा उजवा कालवा आहे. त्या कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनसुद्धा होते. नहराच्या पाळीतून शेतात पाणी झिरपत असल्याने पिक घेता येणे कठिण झाले आहे नाही. शेतामध्ये नेहमी पाणी साचत असल्याने जमीन ही दलदल झाली आहे. या दलदलीमुळे शेतामध्ये साधी बैलजोडी असो व मग ट्रॅक्टर असो नेताच क्षणी बांधामध्ये फसतो. त्यामुळे नांगरणी, वखरणी करणे अवघड झाले आहे. शेतामध्ये धानाचे पीक घ्यायचे म्हटले तर चिखलणी करावी लागते. परंतु ट्रॅक्टर वा बैलजोडी फसत असेल तर चिखलणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उजवा कालवा वाही यांना या पाण्याविषयी अर्ज निवेदन देत आहेत. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी गप्प आहेत. शेतामध्ये नेहमी पाणी राहिला तर आयुष्यभरासाठी शेती सोडावी तर लागणार नाही. असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. याच शेताच्या भरवशावर शेतकरी परिवार चालवित असतात. परंतु शेतात पाणी साचत राहिला तर उपासमारीची पाळी आल्याचे शेतकरी मनोहर आकरे, भगवान रामटेके, विनोद हटवार, मच्छिंद्र हटवार, रामकृष्ण देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, रमेश हटवार यांनी निवेदनातून व्यथा मांडली आहे. (वार्ताहर)