शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर

By admin | Updated: July 19, 2016 00:35 IST

भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, ...

आज गुरूपोर्णिमा : शहापुरात महान सत्संग कार्यक्रम, भाविकांची उपस्थितीभंडारा : भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. विनम्र झाल्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, असे मार्मिक तथा आत्मिक प्रवचन सद्गुरुदेव सतपाल महाराज यांच्या आत्मअनुयायी व अनुभवी साध्वी मैत्रेय बाईजी यांनी केले.गुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून मानव उत्थान सेवा समिती शाखा भंडाराच्यावतीने १८ जुलै (सोमवारी) सकाळी शहापूर येथील गोपीवाडा मार्गावर असलेल्या स्वागत लॉन येथे आयोजित महान सत्संग समारोहात त्या बोलत होत्या. यावेळी मंचकावर साध्वी दिप्ती बाईजी, साध्वी बागीशा, साध्वी महाश्वेता, साध्वी दिक्षीता, महात्मा तुलसीजी, आदी संतगण उपस्थित होते. सत्संगाची सुरूवात दीपप्रज्वलन तथा सद्गुरु सतपाल महाराज यांच्या चरणपादुकाचे पुजन करून करण्यात आली. संत्संगादरम्यान बालकांनी पंढरीची वारी यावर आधारीत नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्व संतांनी गुरूंची श्रेष्ठता व महिमा यावर आधारीत असे मौलिक प्रवचन केले. दुपारी ३ वाजता महाप्रसादाने संत्सगाची सांगता करण्यात आली. यावेळी भंडारा, कोदामेढी, अड्याळ, नागपूर, लाखनी, पवनी, चोवा-निमगाव यासह अन्य गावातील आत्मिक भाविकगण उपस्थित होते.गुरूशिष्याची परंपरा आजही कायम‘‘गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुदेर्वो महेश्वर: गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ’’आषाढ शुद्ध पौर्णिमा या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. गुरूंना देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आजही याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. कृष्ण, सुदामा-सांदिपनी, जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.