शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या शिकारीत होतेय वाढ

By admin | Updated: December 20, 2014 22:33 IST

गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दोन्ही जिल्ह्यातील तलाव हे जंगलालगत असल्याने बहुतांश वन्यप्राणी हे तलावावर पाणी पिण्यासाठी येत असतात.

दिघोरी (मोठी) : गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दोन्ही जिल्ह्यातील तलाव हे जंगलालगत असल्याने बहुतांश वन्यप्राणी हे तलावावर पाणी पिण्यासाठी येत असतात. मात्र पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ होत आहे.जंगलालगत असलेले सर्व तलाव हे वनविभागाच्या अंतर्गत येत होते. मात्र वनविभागाने सदर तलाव हे पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केल्यामुळे आता या तलावांवर पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध व्हावी यासाठी पाटबंधारे विभागामार्फत तलावांवर खर्च केला. त्यानुसार शेतकऱ्यांना सिंचनाची काही प्रमाणात सोय उपलब्ध झाली. खरीपातील पिकांना पाणी देऊन झाले म्हणजे जवळपास ६० टक्के तलावाची जागा मोकळी होते व त्यात ४० टक्के परिसरात पाणी साचून राहते. नेमक्या याच गोष्टीचा गैरवापर सध्या पाटबंधारे विभाग करीत आहे. जंगलालगत तलावांमध्ये पाणी राहत असल्याने बहुतांश प्राणी हे पाणी पिण्यासाठी या तलावांवर येत असतात. मात्र पाटबंधारे विभागाला जंगली प्राण्याच्या पाण्याचा प्रश्नाशी काही देणे घेणे नसून हा विभाग तलावाची मोकळी पडलेल्या जागेचा लिलाव करून रब्बी पिकांसाठी ठेकेदारांना देत असतात ते ही अत्यल्प दरात म्हणजेच हेक्टरी दोन हजार रुपयात तलावांचे लिलाव पाटबंधारे विभाग करते. रात्रंदिवस तलावावर राहत असून जंगली प्राण्यांनी पिकांचे नुकसान करू नये, यासाठी प्राण्यांना संपविण्याचा जणू काही विडाच या ठेकेदारांनी उचललेला असल्याचे लक्षात येते. तलावाच्या पाण्यात किटकनाशके मिसळतात तर कधी विद्युत स्पर्शाने जंगली प्राण्यांची शिकार करतात किंवा शिकाऱ्यांना हाताशी घेऊन फासे टाकून प्राण्यांना मारले जाते. अशाप्रकारे जंगली प्राण्यांच्या जीवाशी पाटबंधारे विभाग खेळत आहे. वनविभागामार्फत दरवर्षी जंगली प्राण्यांची गणना करते. प्राण्यांची शिकार होऊ नये याकरिता विविध उपाययोजना केल्या जातात. त्यांचे रक्षण व्हावे यासाठी जंगलविभागांचे कर्मचारी दिवसरात्र जंगलामध्ये फिरत असतात तसेच सर्वात महत्वाची बाब म्हणजे जंगली प्राण्यांचा पाण्यावाचून जीव जावू नये याकरिता जंगलात पाणवठे तयार केले जातात. पाटबंधारे विभागाला तलाव हस्तांतरीत करण्यात आल्याने वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.एका बाजूला शासन वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी लाखोंचा खर्च करीत आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभाग तुटपुंज्या रकमेसाठी वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात घालतो. पाटबंधारे विभागाला वन्यप्राण्यांची शिकार बंद होण्याच्या दृष्टीने लिलाव बंद करून आळा घालणे गरजेचे आहे. (वार्ताहर)