शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

वृक्ष कटाई व वन्यप्राणी शिकारीच्या घटनांत वाढ

By admin | Updated: September 2, 2014 23:29 IST

वनपाल व वनरक्षकांचा मागील नऊ दिवसांपासून संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय कमिटीची स्थापना केली आहे. संपादरम्यान जिल्ह्यातील काही वनपरिक्षेत्रात वृक्ष

भंडारा : वनपाल व वनरक्षकांचा मागील नऊ दिवसांपासून संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय कमिटीची स्थापना केली आहे. संपादरम्यान जिल्ह्यातील काही वनपरिक्षेत्रात वृक्ष कटाई जोमात सुरू असून वन्यप्राण्यांच्या शिकारींचेही प्रमाण वाढले आहे. या संपाचा लाकूड वाहतुकीच्या परवान्यासाठी अडसर निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशातील शिकारी टोळी या संपाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने चांदपूर परिसरात दाखल झाल्याचे समजते.संपामुळे वनकर्मचारी कर्तव्यावर नाहीत. त्यामुळे याचा फायदा उचलून अवैध वृक्ष कटाई व वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील रावणवाडी, पिटेझरी, उमरझरी, नाकाडोंगरी, लेंडेझरी, चिखली, पिटेसूर व चांदपूर या वनक्षेत्रात शिकारी व वृक्षकटाई करणाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. नाकाडोंगरी व चिचोली परिसरात फासेपारध्यांनी वन्यप्राण्यांची शिकार केल्या आहेत. या शिकाऱ्यांनी हरीण, चितळ, सांबर, ससा, मोर व अन्य प्राण्यांच्या शिकारी केल्याचे समजते. या प्राण्यांचे मांस खाण्याला चविष्ट असल्याने त्याची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. वनकर्मचारी संपावर असल्याने आता शिकाऱ्यांच्या मनात कुठलीही भीती राहली नसल्याने शिकार होत आहे. वनकर्मचारी संपात सहभागी असल्याने कारवाई किंवा त्याची साधी दखलही कोणी घेणारे अधिकारी वनविभागाकडे नाहीत. त्यामुळे या शिकाऱ्यांचे फावत आहे. तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदपूरचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरात विस्तीर्ण आहे. हे क्षेत्र घनदाट जंगलाने व्याप्त असल्याने ते अतिसंवेदनशिल क्षेत्र म्हणून ओळखले जाते. संपाचा फायदा घेऊन मध्यप्रदेशातील काही शिकारी टोळी चांदपूर जंगलात दाखल झाले आहे. मात्र परिसरातील नागरिक व वनमजुरांच्या नजरेस पडल्याने शिकाऱ्यांनी जागा बदलवून दुसरीकडे आपले ठाण मांडले आहे. संपादरम्यान मोठी शिकार करण्याच्या उद्देशाने ही टोळी चांदपूर क्षेत्रात दबा धरून बसल्याचे संपावरील वनकर्मचाऱ्याने लोकमतला सांगितले.लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वाहतुक परवाना देणारे अधिकारी संपात सहभागी असल्याने अनेक शेतकरी, खासगी कटाईदार व ठेकेदारांकडील कटाई केलेले वृक्ष पडून आहे. पावसाचे दिवस असल्याने याचा विपरीत परिणाम वाहतुकीवर होणार आहे. अनेक ठिकाणावरून लाकडांची बिना टिपीने वाहतुक केली जात आहे. नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना वाहन तपासणीचा अधिकार नसल्याने सध्या अवैध वाहतुक राजरोसपणे सुरू आहे. जिल्ह्यात ५७ आरामशिन आहेत. या आरामशिनवर काही परवानाधारक लाकूड कटाईसाठी येत आहे. तर काही लाकूड बिना परवानगीचा कटाई केल्या जात असल्याचेही समजते. (शहर प्रतिनिधी)