शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

भाजीपाल्याचे दर काेसळत असल्याने बागायतदार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

गत पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याचे दर काेसळले आहेत. दर इतके खाली येतील, याची कल्पनाही शेतकऱ्यांना नसावी. पावसाने मारली दडी, भाव ...

गत पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याचे दर काेसळले आहेत. दर इतके खाली येतील, याची कल्पनाही शेतकऱ्यांना नसावी. पावसाने मारली दडी, भाव पडण्यास कारणीभूत असल्याचे बाेलले जात आहे. अशातच एक व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर धूम करीत आहे. राज्यातील कुठल्या तरी भाजी मंडईत शेतकरी जाेरजाेराने ओरडून कमी किमतीत रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याचा ताे व्हिडिओ आहे. शंभर रुपयाला ढाेबळी मिरचीचे पाेते, पत्ताकाेबीचा पाेता घ्या. असे जाेरजाेराने ओरडत आहे. हा व्हिडिओ भंडारा जिल्ह्यातही व्हायरल हाेत असल्याने बागायतदार शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आपण पिकविलेल्या भाजीपाल्याला भाव मिळणार की नाही, असा प्रश्न आहे. भाजीपाला पिकासाठी एकराला ५० हजार रुपये खर्च असून, दहा हजारही उत्पन्न मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.

बाॅक्स

पाच - दहा रुपये दराने शेतकरी हतबल

धान पट्ट्यात शेतकऱ्यांना भाजीपाला पीक घेण्यासाठी कृषी विभाग उत्साहीत करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी माेठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवत आहे. मात्र, दराची काेणतीही हमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा बळी जात आहे. अनेक शेतकरी वेळप्रसंगी कर्ज घेऊन बागायती शेती करीत आहेत. परंतु पाच - दहा रुपयांच्या पुढे भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

काेट

माेठ्या बाजारपेठेतही भाज्यांचे दर काेसळले आहेत. दाेडका, काकडी, लवकी, चवळी, भेंडी दाेन ते तीन रुपये किलाे दराने विक्री हाेत नसल्याचे चित्र आहे. मात्र, भंडारा येथील बीटीबी सब्जीमंडी शेतकऱ्यांच्या मालाला याेग्य भाव देत आहे. शेतकऱ्यांचा माल राज्य आणि राज्याबाहेर निर्यात करून किमान पाच रुपये दर देत आहे. काेणत्याही शेतकऱ्याचा भाजीपाला मंडीतून परत पाठविला नाही.

- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी, भंडारा