शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
6
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
7
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
8
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
9
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
10
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
11
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
12
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
13
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
14
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
15
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
16
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
17
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
18
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
20
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

गळती थांबविण्यासाठी ‘गट पासिंग’ योजना

By admin | Updated: May 30, 2016 00:55 IST

इयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे.

 इयत्ता नववीच्या परीक्षा ७५० गुणांची : शिक्षण विभागाचा निर्णयशिवशंकर बावनकुळेसाकोलीइयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे. बहुतांशी शाळांमध्ये दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी नववीतील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. यामूळे शासनाने इयत्ता नववीची विशेषत: मुलींचे प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्यासाठी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालकांनी शाळांना सुधारित धोरणांची अंमलबजावणी केली आहे.इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतर ३० दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करवून घेऊन १० जुलैपर्यंत परीक्षा घेऊन २१ जुलैला उत्तीर्णचा निकाल लावण्यात येणार आहे. यात किमान अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत प्रवेश द्यावा. तसेच २० जुलैपूर्वी पालकांची मागणी असली तरी टीसी देऊ नये, १०० टक्के निकाल असणाऱ्या निवडक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची टिमकडून निकाल कमी असणाऱ्या शाळांना उद्बोधन केले जाणार आहे. कमी निकालाच्या शाळांचा अहवाल शिक्षणाधिकारी उपसंचालकांना कळविणार आहेत. इयत्ता नववीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा प्रत्येकी १०० गुण विज्ञान व तंत्रज्ञान १००, गणित १०० गुण, समाजशास्त्र १०० गुण, आयसीटी ५० गुण, व्यक्तिमत्व विकास ५० गुण, शारीरिक शिक्षण ५० गुण अशी ७५० गुणांची प्रथमसत्र व द्वितीय सत्र अशा दोन परिक्षा होतील. प्रत्येक विषयात ३५टक्के उत्तीर्णसाठा आवश्यक आहे. परंतु अनुत्तीर्ण झाल्यास गटपासिंग राहील यात तीन भाषा विषयांच्या गुणांची बेरीज १०५ असावी एका विषयात किमान २५ पेक्षा कमी कुण नको. गणित व विज्ञान विषयाचागट करावा या दोन विषयाची बेरीज ७० असावी पंरतु प्रत्येक विषयात २५ पेक्षा कमी गुण नसावे असे करुनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास ग्रेस गुण एकूण २० द्यावे, ग्रेस गुण एकूण बेरजेत घ्यावे. गेस लावलेल्या विद्यार्थ्याला सपास असा शेरा द्यावा. एवढे करुनी मुलगा नापास करावे. निकाल ३० एप्रिलला असणार आहे. शाळेचा शेवटचा दिवस १ मे व शाळा सुरु होण्याचा दिनांक १५ जून राहणार आहे. एखाद्या विद्यार्थी एखाद्या परीक्षेत गैरहजर असेल तर त्याच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे. त्याने दिलेल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांना दोननेच गुणायचे आहे. त्याची पुन्हा परीक्षा घेऊ नये. अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्यामुळे शिक्षकांचे काम वाढणार आहे. विद्यार्थ्यांची सर्व विषयाची क्षमता मुलापर्यंत प्राप्त होईपर्यंत त्यांना ज्ञानार्जन करणे काही विद्यार्थ्यांना लवकर तर काहींना उशिरा कळते. क्षमता प्राप्त होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. शिक्षकाना यामुळे त्रास होण्यास कारण नाही. - सुभाष बावनकुळे,प्र. गट शिक्षणाधिकारी साकोली