शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

गळती थांबविण्यासाठी ‘गट पासिंग’ योजना

By admin | Updated: May 30, 2016 00:55 IST

इयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे.

 इयत्ता नववीच्या परीक्षा ७५० गुणांची : शिक्षण विभागाचा निर्णयशिवशंकर बावनकुळेसाकोलीइयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे. बहुतांशी शाळांमध्ये दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी नववीतील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. यामूळे शासनाने इयत्ता नववीची विशेषत: मुलींचे प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्यासाठी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालकांनी शाळांना सुधारित धोरणांची अंमलबजावणी केली आहे.इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतर ३० दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करवून घेऊन १० जुलैपर्यंत परीक्षा घेऊन २१ जुलैला उत्तीर्णचा निकाल लावण्यात येणार आहे. यात किमान अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत प्रवेश द्यावा. तसेच २० जुलैपूर्वी पालकांची मागणी असली तरी टीसी देऊ नये, १०० टक्के निकाल असणाऱ्या निवडक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची टिमकडून निकाल कमी असणाऱ्या शाळांना उद्बोधन केले जाणार आहे. कमी निकालाच्या शाळांचा अहवाल शिक्षणाधिकारी उपसंचालकांना कळविणार आहेत. इयत्ता नववीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा प्रत्येकी १०० गुण विज्ञान व तंत्रज्ञान १००, गणित १०० गुण, समाजशास्त्र १०० गुण, आयसीटी ५० गुण, व्यक्तिमत्व विकास ५० गुण, शारीरिक शिक्षण ५० गुण अशी ७५० गुणांची प्रथमसत्र व द्वितीय सत्र अशा दोन परिक्षा होतील. प्रत्येक विषयात ३५टक्के उत्तीर्णसाठा आवश्यक आहे. परंतु अनुत्तीर्ण झाल्यास गटपासिंग राहील यात तीन भाषा विषयांच्या गुणांची बेरीज १०५ असावी एका विषयात किमान २५ पेक्षा कमी कुण नको. गणित व विज्ञान विषयाचागट करावा या दोन विषयाची बेरीज ७० असावी पंरतु प्रत्येक विषयात २५ पेक्षा कमी गुण नसावे असे करुनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास ग्रेस गुण एकूण २० द्यावे, ग्रेस गुण एकूण बेरजेत घ्यावे. गेस लावलेल्या विद्यार्थ्याला सपास असा शेरा द्यावा. एवढे करुनी मुलगा नापास करावे. निकाल ३० एप्रिलला असणार आहे. शाळेचा शेवटचा दिवस १ मे व शाळा सुरु होण्याचा दिनांक १५ जून राहणार आहे. एखाद्या विद्यार्थी एखाद्या परीक्षेत गैरहजर असेल तर त्याच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे. त्याने दिलेल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांना दोननेच गुणायचे आहे. त्याची पुन्हा परीक्षा घेऊ नये. अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्यामुळे शिक्षकांचे काम वाढणार आहे. विद्यार्थ्यांची सर्व विषयाची क्षमता मुलापर्यंत प्राप्त होईपर्यंत त्यांना ज्ञानार्जन करणे काही विद्यार्थ्यांना लवकर तर काहींना उशिरा कळते. क्षमता प्राप्त होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. शिक्षकाना यामुळे त्रास होण्यास कारण नाही. - सुभाष बावनकुळे,प्र. गट शिक्षणाधिकारी साकोली