शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाण्यासाठी मुख्यधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: May 8, 2016 00:36 IST

पालिका प्रशासनाकडून शहरातील नळजोडणी धारकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येते.

आश्वासनानंतर घेराव मागे : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलनभंडारा : पालिका प्रशासनाकडून शहरातील नळजोडणी धारकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र वैनगंगेचे पात्र ईकोर्निया व रासायनिक द्रव्यामुळे दूषित झाले आहे. हे पाणी पिण्यास सोडण्यात येत आहे. यामुळे संतप्त विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र देवतळे यांना आज घेराव घालण्यात आला. दूषित पाणी पिल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिका व जिल्हा प्रशासनाला अनेकदा निवेदन देवूनही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आज शनिवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी देवतळे यांना घेराव घालण्यात आला. यावेळी वंजारी यांनी नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले व नदीपात्रात पसरलेली ईकॉर्निया नष्ट करण्याची मागणी केली. चर्चेदरम्यान मधुकर कुकडे यांनी वैनगंगा नदी ही गोसीखुर्द धरण बनण्यापुर्वी स्वच्छ होते. नदीचे पाणी पिण्यायुक्त होते आता नदी दूषित झाल्याने पिण्याचे आरोग्य बिघडत आहे. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी देवतळे यांनी शिष्टमंडळाला पिण्याचे पाणी जलसंपदा विभागाकडून विकत घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठ्याचे काम जलसंपदा विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देवतळे यांनी यावेळी दिले. यावेळी तुषार हट्टेवार, अर्जुन सुर्यवंशी, केशव हूड, दामोधर क्षीरसागर, योगेश्वरी कोचे, लोकेश गोन्नाडे, भारत चौधरी, देविदास गभने, जाधवराव साठवणे, गोविंदराव चरडे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)