शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विद्युत खांबाला टेकूचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:43 IST

सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.

ठळक मुद्देखांब कोसळण्याची भीती : सक्करधरा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.नाकाडोंगरी पंचायत समिती अंतर्गत समावेश असणाऱ्या धुटेरा गट ग्रामपंचायतच्या हद्दीत सक्करधरा गाव आहे. या आदिवासी गावाचा प्रशासकीय कारभार १८ कि.मी. अंतरावरून धुटेरा ग्रामपंचायत मधून करण्यात येत आहे. यामुळे गावात जलद गतीने विकास प्रभावित झाला आहे. या गावात समस्या आ वासून उभ्या आहे. गावातील प्रमुख मार्ग शेजारी असणारा जीवंत विद्युत खांब तुटला आहे. या खांबावरून गावात विजेचा प्रवाह सुरु आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. जीवंत विद्युत खांब तुटल्याने गावकऱ्यांनी संभावित धोका टाळण्यासाठी खांबाला टेकूचा आधार दिला आहे. या खांबाची कोसळण्याची भीती असल्याने गावकऱ्यांनी दोरा नी बांधून ठेवले आहे.दोरी तुटल्यास गावात आपत्ती येण्याची शक्यता आहे. यामुळे गावकºयात भीती आहे. या खांबाला काही लाकडाचे टेकू लावण्यात आले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी गोबरवाही वीज वितरण कंपनीचे कार्यालयात माहिती दिली आहे. परंतु दखल घेण्यात आले नाही. याच खांबाचे नजीक गावातील अंगणवाडी इमारत आहे. मैदानात मुले खेळत असल्याने अपघाताची शक्यता आहे. याशिवाय अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे.या अंगणवाडीत असुविधा असताना समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न होत नाही. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. लोकप्रतिनिधीचे या गावाचे विकास कार्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावात ३०५४ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आल आहे. या बांधकामाचे कंत्राट लोकप्रतिनिधींना आहे. गावात त्यांचे येणे जाणे असताना तुटलेल्या विद्युत खांबाकडे त्यांनी नजरेआड केले आहे. आदिवासी गावकऱ्यांना अज्ञानाचा फायदा घेण्यात येत आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत असताना साधी चौकशी करण्यात येत नाही. गावात अनुशेष असताना पाणी समस्या सोडविण्यासाठी सौर पंप गृह मंजूर करण्यात येत नाही. यामुळे गावकरी कसरत करीत आहेत.जीवंत तुटलेला विद्युत खांब बदलविण्यासाठी जलद गतीने कामे करण्यात येत आहेत. नवीन खांब लावण्यात येत आहे.-ए.डी. पंधरे, शाखा अभियंता गोबरवाहीतुटलेला विद्युत खांब कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खांब कोसळण्याची भीती आहे. गावाला विकासात वाळीत टाकण्यात येत असल्याने अन्याय होत आहे.-संजय सरोते, सदस्य ग्रा.पं. सक्करधरा