शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

विद्युत खांबाला टेकूचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:43 IST

सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.

ठळक मुद्देखांब कोसळण्याची भीती : सक्करधरा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.नाकाडोंगरी पंचायत समिती अंतर्गत समावेश असणाऱ्या धुटेरा गट ग्रामपंचायतच्या हद्दीत सक्करधरा गाव आहे. या आदिवासी गावाचा प्रशासकीय कारभार १८ कि.मी. अंतरावरून धुटेरा ग्रामपंचायत मधून करण्यात येत आहे. यामुळे गावात जलद गतीने विकास प्रभावित झाला आहे. या गावात समस्या आ वासून उभ्या आहे. गावातील प्रमुख मार्ग शेजारी असणारा जीवंत विद्युत खांब तुटला आहे. या खांबावरून गावात विजेचा प्रवाह सुरु आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. जीवंत विद्युत खांब तुटल्याने गावकऱ्यांनी संभावित धोका टाळण्यासाठी खांबाला टेकूचा आधार दिला आहे. या खांबाची कोसळण्याची भीती असल्याने गावकऱ्यांनी दोरा नी बांधून ठेवले आहे.दोरी तुटल्यास गावात आपत्ती येण्याची शक्यता आहे. यामुळे गावकºयात भीती आहे. या खांबाला काही लाकडाचे टेकू लावण्यात आले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी गोबरवाही वीज वितरण कंपनीचे कार्यालयात माहिती दिली आहे. परंतु दखल घेण्यात आले नाही. याच खांबाचे नजीक गावातील अंगणवाडी इमारत आहे. मैदानात मुले खेळत असल्याने अपघाताची शक्यता आहे. याशिवाय अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे.या अंगणवाडीत असुविधा असताना समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न होत नाही. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. लोकप्रतिनिधीचे या गावाचे विकास कार्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावात ३०५४ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आल आहे. या बांधकामाचे कंत्राट लोकप्रतिनिधींना आहे. गावात त्यांचे येणे जाणे असताना तुटलेल्या विद्युत खांबाकडे त्यांनी नजरेआड केले आहे. आदिवासी गावकऱ्यांना अज्ञानाचा फायदा घेण्यात येत आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत असताना साधी चौकशी करण्यात येत नाही. गावात अनुशेष असताना पाणी समस्या सोडविण्यासाठी सौर पंप गृह मंजूर करण्यात येत नाही. यामुळे गावकरी कसरत करीत आहेत.जीवंत तुटलेला विद्युत खांब बदलविण्यासाठी जलद गतीने कामे करण्यात येत आहेत. नवीन खांब लावण्यात येत आहे.-ए.डी. पंधरे, शाखा अभियंता गोबरवाहीतुटलेला विद्युत खांब कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खांब कोसळण्याची भीती आहे. गावाला विकासात वाळीत टाकण्यात येत असल्याने अन्याय होत आहे.-संजय सरोते, सदस्य ग्रा.पं. सक्करधरा