शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
4
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
5
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
6
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
7
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
8
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
9
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
10
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
11
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
12
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
13
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
14
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
15
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
16
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
17
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
18
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
19
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
20
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबाला टेकूचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:43 IST

सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.

ठळक मुद्देखांब कोसळण्याची भीती : सक्करधरा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.नाकाडोंगरी पंचायत समिती अंतर्गत समावेश असणाऱ्या धुटेरा गट ग्रामपंचायतच्या हद्दीत सक्करधरा गाव आहे. या आदिवासी गावाचा प्रशासकीय कारभार १८ कि.मी. अंतरावरून धुटेरा ग्रामपंचायत मधून करण्यात येत आहे. यामुळे गावात जलद गतीने विकास प्रभावित झाला आहे. या गावात समस्या आ वासून उभ्या आहे. गावातील प्रमुख मार्ग शेजारी असणारा जीवंत विद्युत खांब तुटला आहे. या खांबावरून गावात विजेचा प्रवाह सुरु आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. जीवंत विद्युत खांब तुटल्याने गावकऱ्यांनी संभावित धोका टाळण्यासाठी खांबाला टेकूचा आधार दिला आहे. या खांबाची कोसळण्याची भीती असल्याने गावकऱ्यांनी दोरा नी बांधून ठेवले आहे.दोरी तुटल्यास गावात आपत्ती येण्याची शक्यता आहे. यामुळे गावकºयात भीती आहे. या खांबाला काही लाकडाचे टेकू लावण्यात आले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी गोबरवाही वीज वितरण कंपनीचे कार्यालयात माहिती दिली आहे. परंतु दखल घेण्यात आले नाही. याच खांबाचे नजीक गावातील अंगणवाडी इमारत आहे. मैदानात मुले खेळत असल्याने अपघाताची शक्यता आहे. याशिवाय अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे.या अंगणवाडीत असुविधा असताना समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न होत नाही. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. लोकप्रतिनिधीचे या गावाचे विकास कार्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावात ३०५४ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आल आहे. या बांधकामाचे कंत्राट लोकप्रतिनिधींना आहे. गावात त्यांचे येणे जाणे असताना तुटलेल्या विद्युत खांबाकडे त्यांनी नजरेआड केले आहे. आदिवासी गावकऱ्यांना अज्ञानाचा फायदा घेण्यात येत आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत असताना साधी चौकशी करण्यात येत नाही. गावात अनुशेष असताना पाणी समस्या सोडविण्यासाठी सौर पंप गृह मंजूर करण्यात येत नाही. यामुळे गावकरी कसरत करीत आहेत.जीवंत तुटलेला विद्युत खांब बदलविण्यासाठी जलद गतीने कामे करण्यात येत आहेत. नवीन खांब लावण्यात येत आहे.-ए.डी. पंधरे, शाखा अभियंता गोबरवाहीतुटलेला विद्युत खांब कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खांब कोसळण्याची भीती आहे. गावाला विकासात वाळीत टाकण्यात येत असल्याने अन्याय होत आहे.-संजय सरोते, सदस्य ग्रा.पं. सक्करधरा