शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

गरिबांच्या घरांना अनुदान अल्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

पालांदूर : शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना निवाराकरिता घरकुल मंजूर केले जाते. याकरिता एक लक्ष वीस हजार रुपयांचे ...

पालांदूर : शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना निवाराकरिता घरकुल मंजूर केले जाते. याकरिता एक लक्ष वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य निर्धारित केले आहे. परंतु इंधन दरवाढीच्या संकटाने बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. वास्तव परिस्थितीचा विचार करून घरकुलाच्या निधीत वाढ करण्याची अपेक्षा लाभार्थ्यांनी केली आहे.

लाखनी तालुक्यात सुमारे पंधराशे लाभार्थ्यांना विविध योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे. यातील पहिला टप्पा घरकुल सुरू होण्यापूर्वीच मिळाला. मात्र त्यानंतर काम अपेक्षित स्तरावर जावूनही उर्वरित निधी मिळण्याकरिता अनेक संकटांचा सामना करावा लागतो. दोन ब्रास रेती घरकुल लाभार्थ्यांना मंजूर असूनही शासनाकडून अपेक्षित सहकार्य होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न आजही पावसाच्या दिवसात सुद्धा अपुरे पडलेले आहे.

लोकप्रतिनिधींनी या विषयात जातीने लक्ष घालत गरिबांच्या जखमेला मलमपट्टीचा आधार देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. आज सगळीकडेच पक्क्या घरांचे बांधकाम केले जाते. सिमेंटचे जंगल सगळीकडेच विस्तारित होत आहे. त्यामुळे सिमेंट, वाळू, विटा, लोखंड व इतर साहित्यासह मजुरीचे दर सुद्धा वाढले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निधीत घरकुल बांधणे निश्चितच अशक्य आहे. पावसाळ्याचे दिवस येऊन सुद्धा गरिबांचे घर अजूनही राहण्यायोग्य झालेले नाही. अभ्यासांती आर्थिक टंचाई हेच एक कारण पुढे असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते रोशन खंडाईत यांनी लोकमतकडे व्यक्त केली.

लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी केवळ गोरगरिबांच्या मतदानाकरिता आपुलकी दाखवितात. त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना गोरगरिबांपर्यंत अपेक्षितरित्या पोहोचत नाही. पोहोचलेल्या योजनांची परिपूर्ण माहिती व त्यातील त्रुटी यांची सुद्धा जाणीव लाभार्थ्यांना नसते. तेव्हा जिल्ह्यातील, तालुक्यातील व स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींनी गोरगरिबांच्या समस्यांना न्याय देत घरकुल निधीत वाढ करावी.