शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

अन्यायाविरुद्ध ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: November 8, 2016 00:34 IST

ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांवर दिवसागणीक प्रशासनाकडून कामाचा बोझा वाढत आहे.

जिल्ह्यातील ३५० ग्रामसेवकांचा सहभाग : १७ तारखेला ग्रामपंचायतीच्या चाव्या देणार गट विकास अधिकाऱ्यांकडेभंडारा : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांवर दिवसागणीक प्रशासनाकडून कामाचा बोझा वाढत आहे. सोबतच अनेक ठिकाणी ग्रामसेवकांवर हल्ले झालेले असताना त्यांना संरक्षण मिळालेले नाही. यासह अनेक बाबी समोर आल्याने अन्यायाविरुद्ध राज्यातील सुमारे २२ हजार ग्रामसेवकांनी आज एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले. यात भंडारा जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतीचे सुमारे ३५० ग्रामसेवक सहभागी झाले.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयनच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामसेवकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी चर्चा, निवेदने देण्यात आली. मात्र आश्वासनापलिकडे उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे २२ हजार ग्रामसेवकवर्गीय कर्मचाऱ्यांनी आज ७ नोव्हेंबरला राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन पुकारले. ११ नोव्हेंबरला जिल्हा परिषद समोर धरणे, १५ नोव्हेंबरला आयुक्त कार्यालयासमोर धरणे आणि १७ नोव्हेंबरला राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवू, ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून काम बंद आंदोलन करण्याचा निश्चय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयनने घेतला आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ३५० ग्रामसेवकांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखनी, तुमसर, लाखांदूर, मोहाडी, साकोली या पंचायत समितीसमोर ग्रामसेवकांनी दिवसभर धरणे दिले. यामुळे आज दिवसभर ग्रामपंचायतीचे कामकाज रखडले. हीच परिस्थिती ११, १५ नोव्हेंबरला उद्भवणार आहे. यासोबतच १७ नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारणार असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून प्रश्न सुटेपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रलंबित प्रश्नांमध्ये कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्षे सेवाकाळ तात्काळ नियमित करणे, सोलापूर जिल्ह्यातील २३९ लोकांची चुकीची कारवाई रद्द करणे, ग्रामसेवकांना दरमहा पगारासोबत तीन हजार रुपये प्रवासभत्ता देणे, नरेगाकरिता स्वतंत्र योजना निर्मिती करणे, ग्रामसेवक संवर्ग शैक्षणिक अहर्तेत बदल करणे, ग्रामसेवक संवर्ग वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळणे, राज्यभर आदर्श ग्रामसेवक सोहळा मंजूर करणे, २०१३ चे विना चौकशी फौजदारी परिपत्रक मागे घेणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जूनी सेवानिवृत्ती योजना लागू करणे, निलंबित ग्रामसेवकांना प्राधान्याने कामावर घेणे आदींचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)या आहेत ग्रामसेवकांच्या मागण्याग्रामसेवकांना अतिरिक्त कामे लादणे, मारहाण, राज्यभर प्रशासन जाचाला कंटाळून २८ ग्रामसेवकांच्या आत्महत्या, जास्तीच्या ग्रामसभा, ग्रामसेवकाला टार्गेट करणे, न्यायप्रश्न न सोडविणे, नरेगा योजनेमुळे अनेक ग्रामसेवकांवर चुकीचे गुन्हे दाखल करणे, निलंबन, फौजदारी केसेस, चुकीच्या वसुली रकमा आदी महत्वपूर्ण बाबींवर राज्य शासनाने तोडगा काढलेला नसल्याने हा अन्याय सहन करावा लागत असल्याने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ग्रामसेवकांचे भरीव कार्यग्रामसेवक शासनाच्या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करीत आहेत. यात दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना, पिण्याचा पाणी पुरवठा, नरेगा योजना, वेगवेगळी अभियाने यशस्वी करणे, १३ व १४ व्या वित्त आयोगाची योग्य अंमलबजावणी करणे, ग्रामीण भागाचा विकास करण्यात महत्वाची भूमिका निभावणे, प्रशासनाला सहकार्य करणे आदी महत्वाच्या भूमिका निभवीत असणाऱ्या ग्रामसेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामसेवक युनीयनने केला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन आहे. दरम्यान कामाचा खोळंबा होणार नाही याची दक्षता जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक घेणार आहेत. मात्र प्रशासनाला असहकार्य करणार आहेत. यात प्रशासनाला कुठल्याही पद्धतीचा अहवाल देणार नाही व पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने बोलाविलेल्या सभांवर बहिष्कार टाकण्यात येईल. - शिवपाल भाजीपालेअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, ग्रामसेवक युनीयन, भंडारा.