शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श’ ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा रखडला

By admin | Updated: January 17, 2017 00:15 IST

ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा असून ग्रामीण भागातील विकासामध्ये त्यांचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे.

वेतनवाढीचा प्रश्न ऐरणीवर : चार वर्षांपासून ५६ ग्रामसेवक उपेक्षितप्रशांत देसाई भंडाराग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा असून ग्रामीण भागातील विकासामध्ये त्यांचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. ग्रामसेवकांच्या कामाचे मूल्यमापन होऊन गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी, याकरिता शासनाने ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ योजना जाहीर केली. परंतु, जिल्हा परिषदने सन २०१२-१३ पासून पुरस्कार वितरण केलेच नसल्याने जिल्ह्यातील ५६ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कारापासून वंचित आहेत.मध्यंतरी सहाव्या वेतन आयोगाची अडसर टाकीत पुरस्कार देता येणार नसल्याच्या सूचना केल्याने राज्यातील जिल्हा परिषदेतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वाटप वांद्यात सापडले होते. त्यानंतर राज्यातील अन्य जिल्हा परिषदमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मात्र, भंडारा जिल्ह्यातही हा पुरस्कार मागील तीन वर्षांपासून देण्यातच आला नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी दिवसरात्र जागून एक करणाऱ्या ग्रामसेवकाला जिल्हा परिषद पुरस्कारापासून वंचित ठेवत असल्याच्या प्रतिक्रिया उमट आहे. गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना जाहीर केली. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार ग्रामसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्याची तरतूद शासनाने केली आहे. प्रत्येक पंचायत समितीस्तरावरून एक ग्रामसेवक व एक ग्रामविकास अधिकारी असे दोघे या पुरस्कारासाठी निवडायचा असून, त्याच्या कामाचा प्रस्ताव विस्तार अधिकारी, खंडविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे सोपस्कार आहे. या प्रस्तावाची अंतिम यादी मुख्य कार्यपालकन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण होते. गांधी जयंती हा ‘गावगाडा’ दिवस म्हणूनही साजरा होतो. गावाच्या विकास वर्षाची सुरुवात म्हणून या दिवशी हे पुरस्कार देणे क्रमप्राप्त आहे. ग्रामसेवकांच्या कामाचे श्रेय म्हणून त्यांना पगारात एक वेतनवाढ देण्याचे धोरण आहे. मात्र, जिल्हा परिषदने मागील चार वर्षांपासून या पुरस्काराचे वितरणच केले नाही. सहावा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू झाल्याने ग्रामसेवकांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कमालीची वाढ झाली. त्यामुळे हा पुरस्कार देताना ही वेतनवाढ देणे शक्य नसल्याचे शासनाने जावई शोध केला आहे. याच कारणावरून ही पुरस्कार योजना थंडबस्त्यात पडल्याचे समजते. ग्रामविकासचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना वेतनवाढीसोबतच त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार देवून सन्मानित करणे महत्त्वाचे आहे. समारंभ न घेता केवळ कागदोपत्री पंचायत समितीला कळविण्याऐवजी प्रत्यक्ष समारंभात गौरव करून त्यांच्या कार्याची दखल घ्यावी. यामुळे ग्रामसेवकांच्या मानसिकतेत बदल होवून गाव विकासाला चालना मिळेल.एस. टी. भाजीपाले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, भंडारा.कर्मचारी पुरस्कारापासून वंचितएका पंचायत समितीमधून एक ग्रामसेवक व एक ग्रामविकास अधिकारी असे दोघांची पुरस्कारासाठी निवड करायची आहे. जिल्ह्यात सात पंचायत समिती असल्याने एका वर्षातील दोन याप्रमाणे वर्षभरात चौदा तर चार वर्षात ५६ ग्रामसेवकांना हा पुरस्कार प्राप्त होणार आहे. मात्र, जिल्हा परिषदने पुरस्कार वितरण सोहळा घेतला नसल्याने ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी पुरस्कारापासून वंचित आहेत.