शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

भीतीच्या सावटात होते ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:29 IST

आमगाव तालुक्यातील टेकरी ग्रामपंचायतची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामसभा व कार्यालयीन वेळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देटेकरी येथील जीर्ण इमारत : बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककालीमाटी : आमगाव तालुक्यातील टेकरी ग्रामपंचायतची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामसभा व कार्यालयीन वेळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पंचायत समिती आमगाव अंतर्गत टेकरी ग्रामपंचायतची इमारत १९६२ मध्ये तयार करण्यात आली. या इमारतीला ५६ वर्ष झाले असून आता ही इमारत जीर्ण झाली आहे. सदर इमारतीच्या भिंती व स्लॅब कोसळत आहे. कार्यालयीन कामानिमित्त किंवा ग्राम सभेदरम्यान मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्राम सभेला शेकडो नागरिकांची उपस्थिती असते. अशावेळी स्लॅब कोसळल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेकरी व मानेकसा येथील लोकसंख्या ११०२ असून २०० च्यावर कुटुंब संख्या आहे.येथील नागरिक शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून असतात. ग्रामपंचायतीकडून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी सचिव कौशल्या कोंबडीबुरे, सरपंच शेवंता सोनवाने, उपसरपंच महेंद्र रहांगडाले प्रयत्नरत असतात. परंतु जीर्ण इमारतीमुळे कधी धोका होईल हे सांगता येत नाही. पंचायत समितीकडे नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव पाठविला. मात्र त्याची अद्यापही दखल घेतली नाही.ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी २०१४ पासून दरवर्षी ठराव पाठवित आहोत.परंतु प्रशासनाने याची अद्यापही गांर्भियाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने याची वेळीच दखल घेवून इमारत बांधकामाला मंजुरी देण्याची गरज आहे.-शेवंता सोनवानेसरपंच ग्राम पंचायत टेकरी.