शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

ग्रामसभा ठरल्या कुचकामी

By admin | Updated: March 19, 2015 00:39 IST

कोणत्याही गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असते. या ग्रामसभेला संबंधित गावातील प्रत्येक कर्मचाऱ्याने उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

तुमसर : कोणत्याही गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असते. या ग्रामसभेला संबंधित गावातील प्रत्येक कर्मचाऱ्याने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र ग्रामस्थ उदासीन असल्याने ग्रामसेवक वगळता ग्रामस्थांसह इतर सर्वच कर्मचारी ग्रामसभेकडे पाठ फिरवीतात. परिणामी या ग्रामसभा आता कुचकामी ठरत आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीने वर्षातून किमान सहा ग्रामसभा घेणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभांचे आयोजनही केले जाते. या ग्रामसभेत नियोजन व सनियंत्रण केले जाते. त्यात अनेक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करावयाची असते. मात्र, ग्रामस्थच त्याबाबत प्रचंड उदासीन आहेत. परिणामी ग्रामसभेला ग्रामसेवकासह ग्रामपंचायतीचे निवडक पदाधिकारी तेवढे उपस्थित दिसतात. अत्यंत कमी प्रमाणात ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित राहतात. या ग्रामसभेला गावातील विविध समितीचे सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक-सेविका, कृषी सहाय्यक, वन कर्मचारी, पशू सहाय्यक, पोलिस पाटील, वीज कर्मचारी, तलाठी आदी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र ते उपस्थितच राहत नाही असे चित्र अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे ही ग्रामसभाच वांझोटी ठरत आहे. निवडक ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या तालावर ग्रामसभा नाचत आहे. ग्रामसभेकडे जवळपास सर्वच कर्मचारी बहुतांश ग्रामस्थ पाठ फिरवीत असल्याने त्या गावाचा विकास खोळंबतो. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षातच येत नाही. या ग्रामसभेत गावातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपापल्या कामाचा आढावा, तसेच शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे आवश्यक नव्हे तर बंधनकारक आहे. तरीही कर्मचारी पाठ फिरवितात. त्याबाबत कुणी तक्रारही करीत नाही. त्यामुळे कर्मचारी शिरजोर झाले आहे. संबंधित गावातील कर्मचारी जर ग्रामसभेला कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित असतील, तर त्यांच्याविरुध्द गटविकास अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. त्यांची वेतनवाढ रोखण्याचेही निर्देश शासनाने दिले आहे. तथापि राज्य शासनाच्या या आदेशांची कोणत्याही गावात अंमलबजावणी होताना दिसत नाही. ग्रामस्थच उदासीन असल्यामुळे कर्मचारी सोकावले आहे. ग्रामस्थांना मिळत नाही. ग्रामस्थाना विविध योजनांचीही निट माहिती मिळत नाही. ग्रामस्थच मिळत नाही. ग्रामस्थांना विविध योजनांचीही निट माहिती मिळत नाही. ग्रामस्थच ग्रामसभेला चाट मारित असल्याने कर्मचाऱ्यांचे फावत आहे. सोबतच मुठभर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्ताधारी आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेऊन मोकळे होत आहेत. नंतर मात्र हेच ग्रामस्थ ओरड करतात. त्यामुळे वेळ निघून गेलेली असते. या प्रवृत्तीत सुधारणा झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचं गाव आमचं सरकार ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)