शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नाने गाजली ठाण्याची ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:45 IST

१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त : चौकशी करा, नंतरच तंटामुक्त समिती गठित करा

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : १५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. आधी पाणी प्रश्नावर चर्चा करा नंतर समिती गठित करा, असा एकच सुर उपस्थितांकडून निघाला. चर्चा झाली. मात्र समिती गठित झाली नाही. सभाध्यक्ष सरपंच कल्पना निमकर यांनी सभा समाप्तीची घोषणा केली.नियमानुसार दरवर्षी १५ आॅगस्टला वैयक्ती लाभाच्या योजना व गावातील नवीन योजनाचे योजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येतो. त्यानुसार १५ आॅगस्टला १२ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे कोरम पूर्ण झाल्याने सभेला सुरूवात करण्यात आली. उपस्थिताकडून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला की पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण पैसा खर्च झाला. आणि गावाला तीन वर्षापासून एकही थेंब पाणी मिळाला नाही. यावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी हा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे यावर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करावी. त्यापुर्वी लोकाभिमूक शासकीय परिपत्रकाचे वाचन व वार्षिक नियोजन विषयक चर्चा होऊ द्या. यावर उपस्थित नागरिकांनी सहमती दर्शवित विषय सुचीनुसार सभेला सुरूवात झाली. ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे यांनी शासन परिपत्रकाचे वाचन केले. स्वच्छते विषयी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. घरकुल यादीचे वाचन करण्यात आले. महात्मा गांधी रोजगार हमीचे पुढील सन २०१८-१९ वार्षिक व सन २०१७-१८ चे पुरक नियोजन विषयक चर्चा घेण्यात आली. यावर उपस्थित पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम यांनी गावातील नोंदणीकृत मजुरांना काम न मिळाल्यामुळे बेकारी भत्ता का देण्यात आलेला नाही. यावर ग्रामरोजगार सेवक हुमणे यांनी याविषयीमाहिती दिली. काम उपलब्ध असताना कामावर घेण्याचे दवंडीद्वारे आवाहन केले असता फक्त दोन मजुर कामावर आले आणि तेही आम्ही खोदकाम करून शकत नाही, असे सांगितले. मग भत्ता देण्याचा प्रश्न येथे येत नाही. व तदनंतर एकच गदारोड उडाला. पुन्हा पाणीप्रश्न आधी घ्या असा एकच सुरू उमटला. यात मागील कार्यकाळात समिती सदस्य असलेले व जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी याविषयी माहिती दिली. पंधरा दिवसात नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. पाणी द्या मगच दारूबंदी करा, स्वच्छ गाव केल्यावर तंमुस समिती गठित करा, अशी मागणी झाली. सभेत व्यत्यय येत असल्याच्या कारण पुढे करीत निमकर यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना विशेष सभेत करण्याचे जाहीर केले.