शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

पाणी प्रश्नाने गाजली ठाण्याची ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:45 IST

१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त : चौकशी करा, नंतरच तंटामुक्त समिती गठित करा

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : १५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. आधी पाणी प्रश्नावर चर्चा करा नंतर समिती गठित करा, असा एकच सुर उपस्थितांकडून निघाला. चर्चा झाली. मात्र समिती गठित झाली नाही. सभाध्यक्ष सरपंच कल्पना निमकर यांनी सभा समाप्तीची घोषणा केली.नियमानुसार दरवर्षी १५ आॅगस्टला वैयक्ती लाभाच्या योजना व गावातील नवीन योजनाचे योजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येतो. त्यानुसार १५ आॅगस्टला १२ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे कोरम पूर्ण झाल्याने सभेला सुरूवात करण्यात आली. उपस्थिताकडून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला की पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण पैसा खर्च झाला. आणि गावाला तीन वर्षापासून एकही थेंब पाणी मिळाला नाही. यावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी हा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे यावर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करावी. त्यापुर्वी लोकाभिमूक शासकीय परिपत्रकाचे वाचन व वार्षिक नियोजन विषयक चर्चा होऊ द्या. यावर उपस्थित नागरिकांनी सहमती दर्शवित विषय सुचीनुसार सभेला सुरूवात झाली. ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे यांनी शासन परिपत्रकाचे वाचन केले. स्वच्छते विषयी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. घरकुल यादीचे वाचन करण्यात आले. महात्मा गांधी रोजगार हमीचे पुढील सन २०१८-१९ वार्षिक व सन २०१७-१८ चे पुरक नियोजन विषयक चर्चा घेण्यात आली. यावर उपस्थित पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम यांनी गावातील नोंदणीकृत मजुरांना काम न मिळाल्यामुळे बेकारी भत्ता का देण्यात आलेला नाही. यावर ग्रामरोजगार सेवक हुमणे यांनी याविषयीमाहिती दिली. काम उपलब्ध असताना कामावर घेण्याचे दवंडीद्वारे आवाहन केले असता फक्त दोन मजुर कामावर आले आणि तेही आम्ही खोदकाम करून शकत नाही, असे सांगितले. मग भत्ता देण्याचा प्रश्न येथे येत नाही. व तदनंतर एकच गदारोड उडाला. पुन्हा पाणीप्रश्न आधी घ्या असा एकच सुरू उमटला. यात मागील कार्यकाळात समिती सदस्य असलेले व जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी याविषयी माहिती दिली. पंधरा दिवसात नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. पाणी द्या मगच दारूबंदी करा, स्वच्छ गाव केल्यावर तंमुस समिती गठित करा, अशी मागणी झाली. सभेत व्यत्यय येत असल्याच्या कारण पुढे करीत निमकर यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना विशेष सभेत करण्याचे जाहीर केले.