शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नाने गाजली ठाण्याची ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:45 IST

१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त : चौकशी करा, नंतरच तंटामुक्त समिती गठित करा

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : १५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. आधी पाणी प्रश्नावर चर्चा करा नंतर समिती गठित करा, असा एकच सुर उपस्थितांकडून निघाला. चर्चा झाली. मात्र समिती गठित झाली नाही. सभाध्यक्ष सरपंच कल्पना निमकर यांनी सभा समाप्तीची घोषणा केली.नियमानुसार दरवर्षी १५ आॅगस्टला वैयक्ती लाभाच्या योजना व गावातील नवीन योजनाचे योजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येतो. त्यानुसार १५ आॅगस्टला १२ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे कोरम पूर्ण झाल्याने सभेला सुरूवात करण्यात आली. उपस्थिताकडून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला की पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण पैसा खर्च झाला. आणि गावाला तीन वर्षापासून एकही थेंब पाणी मिळाला नाही. यावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी हा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे यावर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करावी. त्यापुर्वी लोकाभिमूक शासकीय परिपत्रकाचे वाचन व वार्षिक नियोजन विषयक चर्चा होऊ द्या. यावर उपस्थित नागरिकांनी सहमती दर्शवित विषय सुचीनुसार सभेला सुरूवात झाली. ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे यांनी शासन परिपत्रकाचे वाचन केले. स्वच्छते विषयी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. घरकुल यादीचे वाचन करण्यात आले. महात्मा गांधी रोजगार हमीचे पुढील सन २०१८-१९ वार्षिक व सन २०१७-१८ चे पुरक नियोजन विषयक चर्चा घेण्यात आली. यावर उपस्थित पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम यांनी गावातील नोंदणीकृत मजुरांना काम न मिळाल्यामुळे बेकारी भत्ता का देण्यात आलेला नाही. यावर ग्रामरोजगार सेवक हुमणे यांनी याविषयीमाहिती दिली. काम उपलब्ध असताना कामावर घेण्याचे दवंडीद्वारे आवाहन केले असता फक्त दोन मजुर कामावर आले आणि तेही आम्ही खोदकाम करून शकत नाही, असे सांगितले. मग भत्ता देण्याचा प्रश्न येथे येत नाही. व तदनंतर एकच गदारोड उडाला. पुन्हा पाणीप्रश्न आधी घ्या असा एकच सुरू उमटला. यात मागील कार्यकाळात समिती सदस्य असलेले व जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी याविषयी माहिती दिली. पंधरा दिवसात नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. पाणी द्या मगच दारूबंदी करा, स्वच्छ गाव केल्यावर तंमुस समिती गठित करा, अशी मागणी झाली. सभेत व्यत्यय येत असल्याच्या कारण पुढे करीत निमकर यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना विशेष सभेत करण्याचे जाहीर केले.