शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

भोंग्यांचा दणदणाट, गावागावांत उडतोय प्रचाराचा धुरळा; ग्रा.पं. निवडणुकीचे वातावरण तापले

By युवराज गोमास | Updated: December 14, 2022 17:21 IST

थेट रणांगणावरील युद्धाचा आभास

भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीचा थेट बार आता उडू लागला आहे. शहरे शांत असली तरी ग्रामीण भागात भोंगे, बॅनर यांचे युद्ध रंगत चालले आहे. आणखी तीन दिवस रणधुमाळी सुरू राहणार आहे. काही शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक निवडणूक मैदानात असल्याने तेही छुप्या पद्धतीने कामाला लागले आहेत. एकंदर गावागावात प्रचाराचा धुरळा उडतो आहे. भोंग्यांच्या दणदणाटाने अनेकांची झोपमोड होत असून थेट रणांगणावरील युद्धाचा आभास होत आहे.

मोहाडी तालुका वगळता इतर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात सदस्यपदांसाठी ६१०३ तर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून येण्यासाठी १०४९ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढे राजकारण होत नाही, त्यापेक्षा अधिक जिद्द आणि कट्टरपणे ही निवडणूक लढवली जाते.

निवडणुकांच्या खर्चावर शासनाने मर्यादा घातली असली तरी त्यापेक्षा अधिक पैसा खर्ची घातला जात आहे. परंतु हिशेबाचे संतुलन राखण्याचे कसब समर्थकांना चांगलेच ठाऊक असल्याचे बोलले जाते. निवडणुकांत पैसा गैरवापर प्रभाव पाडणारा ठरतो आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळण्यासाठी निवडणूक विभागाची जबाबदारी वाढली आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी जागृत होत कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. एकाचा फायदा आणि दुसऱ्याचे नुकसान असे होऊ नये, यासाठी वेळीच आवरणे गरजेचे आहे.

शहरालगतच्या निवडणुका बहुकोणीय

भंडारा शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बहुकोणी व चुरशीच्या निवडणुका होत आहेत. सरपंचपदासाठी पॅनलसोबत स्वतंत्र उमेदवारांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या रंगात सगळे जण न्हाऊन घेण्यास तयार आहेत. अनेक ठिकाणी शासकीय कर्मचारी उघडपणे निवडणुकीच्या प्रचारात आहेत. मोठ्या निवडणुकांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, मग ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अशांचा हस्तक्षेप मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा नाही का, असा प्रश्न आहे.

बदलला ट्रेंड, जाहीरनाम्यांचा पाऊस

पूर्वीचे बिल्ले आणि गाडीला बांधलेले भोंगे हद्दपार झाले असून आता मोठमोठे बॅनर व फ्लेक्सने जागा घेतली आहे. डीजेवर वाजणारे गाणे तरुणांना नाचविल्याशिवाय सोडत नाही. मोबाइलवरील सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार पराकोटीचा आहे. आता मतदारांनी आभासी पद्धतीने मतदान यंत्राचे बटन दाबावे, एवढेच काय ते शिल्लक आहे. लोकसभा, विधानसभेत जाहीरनामे झळकत होते, परंतु आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही उमेदवार जाहीरनामे देऊन मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणbhandara-acभंडाराgram panchayatग्राम पंचायत