शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

राजू बांते मोहाडी : गाव तेथे गट अन् तट. विविध पक्षांसोबत बांधिलकी असणारे नेते. यांचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पत व ...

राजू बांते

मोहाडी : गाव तेथे गट अन् तट. विविध पक्षांसोबत बांधिलकी असणारे नेते. यांचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पत व सन्मानासाठी चांगलाच कस लागणार आहे.

राजकीय नेत्यांनी आपले वजन वाढावे यासाठी प्रत्येक गावात कार्यकर्ते निर्माण केले आहेत. काही नेत्यांनी तर एका गटाचे दुसऱ्यांशी भांडण लावून आपले राजकारण चालवले आहे. त्यामुळे गावागावात एकीच्या बळाला खिंडार पडली आहे. गट, तट, पक्ष यामुळे मतभेद वाढून गावातील एकतेची मोठी दरी निर्माण झाली आहे. याच कारणामुळे गावात पक्ष, गट, जात या समीकरणावर गावपातळीवर निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. कोण उमेदवार कोणाच्या गटाचा, कोणत्या पक्षाचा समर्थित आहे, याची जाणीव गाव मतदारांना असतेच. कोणता पुढारी पॅनल लढवीत आहे, याचाही अभ्यास मतदारांना झालेला आहे. गावात विविध राजकीय पक्षांचे नेते, गटाचे कार्यकर्ते तालुका, जिल्हा पातळीवरच्या सत्तास्थानी आहेत. आपण उभी केलेले पॅनल निवडून आले पाहिजे, यासाठी जिकरीचे गाव नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाला तर त्यांची वरिष्ठ नेत्यांजवळ मानहानी होणार आहे. गावा सांभाळता आले नाही तर मोठ्या नेत्यांना त्यांची लायकी किती हे दिसून येणार आहे. गावातील पत, सन्मान व प्रतिष्ठा वाचविण्यासाठी गाव नेत्यांची चांगलीच धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गावनेत्यांना सन्मानाची लढाई जिंकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिक धडकी भरली आहे.