शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ग्रामपंचायत निवडणूक : २२१ सदस्य निर्विरोध; प्रचाराला उरले दोनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 16:42 IST

ओल्या पार्ट्यांना उधाण, रात्रीला पडतोय पैशांचा पाऊस

भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीत गल्लोगल्लीचे राजकारण ढवळून काढणारा माहोल सध्या बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. प्रचाराला केवळ दोन दिवस उरल्याने उमेदवार गल्लोगल्ली पिंजून काढत आहे. निवडणुकीचा जोर शिगेला पोहोचला असून ‘ जिंकून मीच येणार ’ असा सज्जड आत्मविश्वास ही उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

गावचा सरपंच होणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची पद प्राप्ती सारखेच स्वप्न उमेदवाराचे असते. अनेक ग्रामपंचायतीमध्ये निर्विरोध सरपंच तर कुठे अविरोध सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मोहाडी तालुका वगळता सहाही तालुक्यांमध्ये निवडणुकांचा माहोल शिगेला पोहचला आहे. सायंकाळ सहा नंतर प्रचार थांबत असला तरी त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होत असते. हॉटेल आणि ढाबे ओल्या पार्ट्यांमुळे हाऊसफुल्ल झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात दारू विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकेका मतासाठी एकेका कुटुंबाला किती रक्कम मोजायची याचीही जुळवाजुळव होऊ लागली आहे. किंबहुना काही क्षेत्रात तर पैसेही वाटून झाल्याची चर्चा आहे. 

उमेदवाराने मागू नये उधारी

दिघोरी (मोठी) : ग्रामपंचायत निवड- णुकीचा ज्वर जसजसा वाढत आहे तसतशी नवनवीन बाबही समोर येत आहे. असाच एक प्रकार लाखांदुर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे समोर आला आहे. येथे चक्क एका पानटपरीचालकाने कोणत्याही राजकीय उमेदवाराने निवडणुक होईपर्यंत उधारी मागु नये, अशा आशयाचा फलक लावला आहे, राजकीय उमेदवार उधारी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा चांगला अनुभव असल्याचेही पानटपरी चालकाचे म्हणणे आहे.

दोन हजार ३३० सदस्यांसाठी निवडणूक

१८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३०५ ग्रामपंचायतीअंतर्गत प्रत्यक्षरित्या २ हजार ३३० सदस्य निवडून देण्याकरिता मतदान केले. जाणार आहे. पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्राम-पंचायतींची संख्या ४ आहे. परंतु यात सरपंच अविरोध निवडून आलेले नाहीत. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या सदस्यांच्या जागांसाठी तुमसर तालुक्यात ६०६, भंडारा ३३७, पवनी ३५६, लाखनी ३७५, साकोली ३०८ तर लाखांदूर तालुक्यातील ३४८ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

तहसीलदारांकडून चाचणी

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकाही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, सदस्यपद जाहीर लिलावाने भरल्याबाबतचे प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे यांची खातरजमा संबंधित तहसीलदारांकडून करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे बिनविरोध उमेदवार निवडून येताना त्यांनी इतर उमेदवारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव तर आणला नाही ना याचीही तहसीलदारांमार्फत शहानिशा झाल्यानंतरच अविरोधची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक विभागातर्फेही याबाबतची सूचना निर्गमित करण्यात आली आहे.

या तालुक्यातील सदस्य अविरोध

अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत नामनिर्देशन अर्ज वैध राहिल्याने व त्यांच्या विरोधात उमेदवार नसल्याने बिनविरोध आलेल्या सदस्यांची संख्या जिल्ह्यात २२१ इतकी आहे. यात तालुकानिहाय आकडेवारीवर नजर घातल्यास तुमसर तालुक्यात २९, भंडारा १४, पवनी २०, लाखनी ३७, साकोली ४८ तर लाखांदूर तालुक्यातील ७३ सदस्यांचा समावेश आहे. यापूर्वी ३०५ ग्रामपंचायतीअंतर्गत २ हजार ५५३ सदस्यांची निवडणूक होणार होती. मात्र आता २२१ सदस्य अविरोध निवडून आल्याने २ हजार ३३० जागांकरिता सदस्य निवडून द्यायचे आहेत.

भाऊ, अक्का व्होट मला पक्का

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी मोठी प्रतिष्ठेची मानली जाते. निवडून येणे म्हणजे जनसामान्यांत आपली प्रतिमा उंचावण्यासारखे असते. त्यामुळेच की काय, उमेदवार आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार करीत आहेत. दिवसभर भोंग्यांचा आवाज आटोपल्यानंतर सायंकाळी घरोघरी भेट देण्याचे व कार्यकर्त्यांना नेऊन पार्टी देण्याचीही काम सुरू आहे. आई, अक्का, ताई, काका काहीही करा पण व्होट मलेच द्या, अशी विनवणी करीत आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायतbhandara-acभंडारा