शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ग्रा.पं. पदाधिकारी योजनांपासून अनभिज्ञ

By admin | Updated: October 14, 2015 00:40 IST

गावचा विकास करावयाचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाचे ध्येय-धोरण काय आहेत,..

प्रशिक्षणाची गरज : उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहनाची गरजमोहन भोयर तुमसर गावचा विकास करावयाचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाचे ध्येय-धोरण काय आहेत, ते कसे राबवायचे यातून गावाचा विकास कसा करावयाचा याबाबत सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. परंतु, नवीन सरपंच, सदस्यांना याबाबतची माहिती नसल्याने गावाचा अपेक्षित असा विकास होऊ शकत नाही. याबाबतचे प्रशिक्षणही वेळोवेळी शासनस्तरावर सुरू असते. परंतु या प्रशिक्षणाला आवश्यक त्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाच्या योजना व गावातील आवश्यक सुधारणा यांचा समन्वय साधता आला तर गावाच्या विकासाला कोणी रोखू शकत नाही. शासनाच्या योजना गावात राबविणे आणि त्यात सहभागी होणे, शासनाच्या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी लाखो रुपयांचे पुरस्कारही दिले जातात. या सर्व बाबींचा योग्य वापर करून घेतल्यास गावाच्या विकासासोबतच लाखो रुपयांचे पुरस्कारही प्राप्त करता येऊ शकते.ते कसे मिळवायचे याचे नव्याने निवडून आलेल्या गावातील ग्रामसदस्य, सरपंच यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना ग्रामसेवकाला लेखी स्वरूपात पंचायत समितीकडून देण्यात येतात. या योजनेची माहिती अनेक गावात ग्रामसभेतून दिलीच जात नाही. सरपंच सदस्य यांनासुद्धा ही माहिती पुरविली जात नाही. मोजक्याच शेतकऱ्यांना माहिती देऊन मोकळे होतात. अशी अनेक उदाहरणे ग्रामीण भागात दिसून येतात. यामुळे संपूर्ण गावाचे नुकसान होते. अनेक प्रशिक्षण, माहिती, जनजागृती आदी संबंधितांची कामे ही कृषी कार्यालय व वनविभाग कागदोपत्रीच राबवित आहेत. काही मर्जीतील लोकांनाच याबाबतची माहिती देऊन कामे उरकविली जात आहेत. त्यामुळे गाव विकासाबाबत सरपंचासह ग्रामसदस्य व गावकरी अनभिज्ञ राहतात. परिणामी गावाचा विकास होत नाही. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासंदर्भात काही सरपंचांसोबत संपर्क साधला असता त्यांनी प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. गावाच्या विकासासाठी नियमित प्रशिक्षण मिळाल्यास गावाचा विकास होईल असे मत काहिंनी व्यक्त केले. ग्रामविकासात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील गावांचा दौरा सरपंच, सदस्यांसाठी काढण्यात यावा. अशा अभ्यास दौऱ्यांचा गावांच्या विकासासाठी लाभ होईल.