शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:08 IST

सर्वसामान्यांच्या जनादेशांमुळे खासदार पदावर निर्वाचित होण्याची मला संधी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत दु्रतगतीने पोहचविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वक्तव्य नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.

ठळक मुद्देसुनील मेंढे यांची पत्रपरिषद : गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्र वाढविणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्यांच्या जनादेशांमुळे खासदार पदावर निर्वाचित होण्याची मला संधी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत दु्रतगतीने पोहचविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वक्तव्य नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.भंडारा येथील विश्रामगृहात बुधवारी दुपारी १ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत खासदार मेंढे बोलत होते. ते म्हणाले, उद्या ३० मे रोजी दिल्ली येथे होणाऱ्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार सर्वांना न्याय व योजनांचा लाभ देण्यासाठी कटीबध्द आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रणालीवर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. त्यासोबतच जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा न जाता त्या दृष्टीने काम होत राहील.यात सर्वप्रथम महत्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांनाच घरे उपलब्ध करण्याचा मानस आहे. यासोबत बेरोजगारांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली आयुष्यमान भारत योजनेचा जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाईल.गोसेखुर्द प्रकल्पावर आतापर्यंत ९५ टक्के निधी खर्च झाला आहे. पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. विशेषत: लाभ क्षेत्रात वाढ करणे गरजेचे असून ७४ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत गोसेखुर्द पाण्याच्या लाभ कसा मिळेल यावर कार्य केले जाईल. तसेच या प्रकल्पाअंतर्गत वितरिका व उपनलिकांचे कामे पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुर्ण करण्याचा मानस आहे. नाग नदीच्या दुषित पाण्यावर तिसºया टप्प्यात नविन प्रकल्प राबविण्यावर कार्य हाती घेण्यात येणार आहे.भंडारा शहरातील रेल्वेच्या जागेबाबद बोलताना खासदार मेंढे म्हणाले, रेल्वेच्या अखत्यारितील जवळपास १३ हेक्टर जमीनीवर येत्या पावसाळ्यात सामाजिक वनिकरण विभागाच्या पुढाकाराने १४ हजार रोप लावून संवर्धन करण्यावर कार्य केले जाणार आहे. विशेषत: यात वृक्षसंवर्धानाची जबाबदारी तीन वर्षांपर्यंत सामाजिक वनीकरणाची राहणार असून त्यात दोन प्रवेशद्वार पाण्याची सुविधा व सुरक्षा भिंत राहणार आहे.पत्रपरिषदेला भाजपचे शहराध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, नितीन धकाते, तुषार काळबांधे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.