शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:08 IST

सर्वसामान्यांच्या जनादेशांमुळे खासदार पदावर निर्वाचित होण्याची मला संधी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत दु्रतगतीने पोहचविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वक्तव्य नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.

ठळक मुद्देसुनील मेंढे यांची पत्रपरिषद : गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्र वाढविणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्यांच्या जनादेशांमुळे खासदार पदावर निर्वाचित होण्याची मला संधी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत दु्रतगतीने पोहचविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वक्तव्य नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.भंडारा येथील विश्रामगृहात बुधवारी दुपारी १ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत खासदार मेंढे बोलत होते. ते म्हणाले, उद्या ३० मे रोजी दिल्ली येथे होणाऱ्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार सर्वांना न्याय व योजनांचा लाभ देण्यासाठी कटीबध्द आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रणालीवर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. त्यासोबतच जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा न जाता त्या दृष्टीने काम होत राहील.यात सर्वप्रथम महत्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांनाच घरे उपलब्ध करण्याचा मानस आहे. यासोबत बेरोजगारांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली आयुष्यमान भारत योजनेचा जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाईल.गोसेखुर्द प्रकल्पावर आतापर्यंत ९५ टक्के निधी खर्च झाला आहे. पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. विशेषत: लाभ क्षेत्रात वाढ करणे गरजेचे असून ७४ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत गोसेखुर्द पाण्याच्या लाभ कसा मिळेल यावर कार्य केले जाईल. तसेच या प्रकल्पाअंतर्गत वितरिका व उपनलिकांचे कामे पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुर्ण करण्याचा मानस आहे. नाग नदीच्या दुषित पाण्यावर तिसºया टप्प्यात नविन प्रकल्प राबविण्यावर कार्य हाती घेण्यात येणार आहे.भंडारा शहरातील रेल्वेच्या जागेबाबद बोलताना खासदार मेंढे म्हणाले, रेल्वेच्या अखत्यारितील जवळपास १३ हेक्टर जमीनीवर येत्या पावसाळ्यात सामाजिक वनिकरण विभागाच्या पुढाकाराने १४ हजार रोप लावून संवर्धन करण्यावर कार्य केले जाणार आहे. विशेषत: यात वृक्षसंवर्धानाची जबाबदारी तीन वर्षांपर्यंत सामाजिक वनीकरणाची राहणार असून त्यात दोन प्रवेशद्वार पाण्याची सुविधा व सुरक्षा भिंत राहणार आहे.पत्रपरिषदेला भाजपचे शहराध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, नितीन धकाते, तुषार काळबांधे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.