शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आदिवासी कुटुंबीयांसाठी शासनाची खावटी अनुदान योजना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्यावतीने साकोली तालुक्यातील ग्राम पिटेझरी व मालूटोला गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. ...

आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्यावतीने साकोली तालुक्यातील ग्राम पिटेझरी व मालूटोला गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, तहसीलदार रमेश कुंभरे, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेव किरसान, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अशोक कापगते, माजी सभापती रेखा वासनिक, पिटेझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, मालू टोलाचे सरपंच कृष्णा टेंभुर्णे, उपसरपंच दिनेश कटरे, सुनीता कापगते, अंजिरा चुटे, छाया पटले, दामोदर नेवारे, लीलाधर पटले आदी मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविकातून आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी नीरज मोरे यांनी, भंडारा जिल्ह्यातील ११७०० आदिवासी कुटुंबीयांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १०,३८४ कुटुंबीयांचे अर्ज वैध ठरले असून त्यांना मंजुरी देऊन सर्व अर्जदारांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील पात्र आदिवासी कुटुंबीयांना खावटी किट वाटप करून उरलेल्या अर्जाच्या त्रुटी पूर्ण केल्यानंतर त्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते उपस्थित लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. संचालन कमलेश सारवे यांनी केले, तर आभार एस. टी. भुसारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

बॉक्स

२०१२ ची बंद झालेली खावटी योजना सुरू झाली

सन २०१२ ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्‍यक वस्तूंचे किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते. राज्यातील साडेबारा लाख आदिवासी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच शासनाने मोहा फुलावरील बंदी उठवली असून त्यावर आधारित उद्योगनिर्मिती करण्याची योजना राबवून जंगलव्याप्त परिसरातील महिला, युवकांना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन भंडाराचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी दिले.