शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यावर शासनाचा भर

By admin | Updated: May 29, 2017 00:20 IST

शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली.

चरण वाघमारे : पांजरा येथे शेतशिवार संवाद फेरीलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली. यावर उपाय म्हणून भाजप सरकारने सर्वप्रथम गुंतवणुकीवर भर देऊन अडीच वर्षात ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी दिले.पांजरा येथील गणेश हिंगे यांच्या शेतात आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिवार फेरीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोहाडी पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती विलास गोबाडे, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, रवी येळणे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबूराव ठवकर, नितीन भाजीपाले, निरंजना साठवणे, श्वेता नारनवरे, चेतन डोंगरे, बोथलीचे उपसरपंच उमेश डाकरे व वंदना बागडे उपस्थित होते.शेती विकासासासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी खर्च केले. यात जलयुक्त शिवार, सिंचन योजना, अन्नसुरक्षा, शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ यावर खर्च करण्यात आले. अडीच वर्षात शेतकऱ्यांना ११ हजार ०९५ कोटी रुपयांची मदत दिली. ६ हजार ७३९ कोटी रुपये शासनाने पीक विम्यावर खर्च केले. शेतकरी कर्जमुक्तीने नाही तर आर्थिक सक्षम झाल्यास कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. यावर उपाययोजना करीत आहे. यासाठी शेतीला मुबलक पाणी, शेतीमालाला भाव आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आमदार वाघमारे यांनी दिली. संचालन घनश्याम बोंद्रे यांनी तर आभार रवी येळणे यांनी मानले.