शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यावर शासनाचा भर

By admin | Updated: May 29, 2017 00:20 IST

शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली.

चरण वाघमारे : पांजरा येथे शेतशिवार संवाद फेरीलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली. यावर उपाय म्हणून भाजप सरकारने सर्वप्रथम गुंतवणुकीवर भर देऊन अडीच वर्षात ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी दिले.पांजरा येथील गणेश हिंगे यांच्या शेतात आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिवार फेरीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोहाडी पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती विलास गोबाडे, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, रवी येळणे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबूराव ठवकर, नितीन भाजीपाले, निरंजना साठवणे, श्वेता नारनवरे, चेतन डोंगरे, बोथलीचे उपसरपंच उमेश डाकरे व वंदना बागडे उपस्थित होते.शेती विकासासासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी खर्च केले. यात जलयुक्त शिवार, सिंचन योजना, अन्नसुरक्षा, शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ यावर खर्च करण्यात आले. अडीच वर्षात शेतकऱ्यांना ११ हजार ०९५ कोटी रुपयांची मदत दिली. ६ हजार ७३९ कोटी रुपये शासनाने पीक विम्यावर खर्च केले. शेतकरी कर्जमुक्तीने नाही तर आर्थिक सक्षम झाल्यास कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. यावर उपाययोजना करीत आहे. यासाठी शेतीला मुबलक पाणी, शेतीमालाला भाव आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आमदार वाघमारे यांनी दिली. संचालन घनश्याम बोंद्रे यांनी तर आभार रवी येळणे यांनी मानले.