शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जमिनीचे पट्टे सरकार जमा करण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 00:23 IST

कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी शासनाने गरीब व गरजू लोकांना २० वर्षांपूर्वी उपजाऊ जमिनीचे पट्टे वाटप केले होते.

वरिष्ठांना निवेदन : राजेंद्र पटले यांचा आरोपतुमसर : कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी शासनाने गरीब व गरजू लोकांना २० वर्षांपूर्वी उपजाऊ जमिनीचे पट्टे वाटप केले होते. आता त्या जमिनीत पिकांची वाढ होत असताना शासनाने ते जमिनीचे पट्टे पुन्हा सरकारजमा करण्याचा सपाटा सुरु केला आहे. हा त्या गरीबांवर अन्याय असून हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी केला आहे. दोन दशकांपूर्वी ज्या गरीब कुटुंबांना शासनाने जमिनीचे पट्टे वाटप केले त्या जमिनीला सुपीक बनवून त्यावर हे कुटुंब उत्पन्न घेत आहेत. ज्या जमिनीत सिंचनाची सोय नव्हती, पीक काढण्याची क्षमता नव्हती अशा परिस्थितीत फक्त त्यांच्या नावावर सातबाराचा उतारा होता. ही जमीन आता आपली झाली आहे असे त्यांना वाटू लागले होते. अनेकांनी स्वखर्चाने त्या शेतजमिनीत नवीन माती टाकून बांधी तयार केली. ती जमीन उपजावू केली. अशातच बावनथडी सिंचन प्रकल्प व गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामुळे सिंचनाचे पाणी मिळेल व जमिनीचा आधार घेऊन उत्पन्नात वाढ होईल अशी आशा या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबाच्या विरोधात अधिकाराचा वापर करून सदर जमीन परत देण्याचा सपाटा सुरु केला आहे. मशागत करून सुपीक केलेली जमीन आम्ही का द्यायची? असा सवाल सदर कुटुंब करीत आहेत. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी कंबर कसली असून या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वरिष्ठांना निवेदन सादर केले आहे. सदर कुटुंबांकडून जमिनीचे पट्टे परत घेण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही पटले यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)