शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

शासनाने वनजमिनीचे पट्टे मोफत द्यावे

By admin | Updated: July 11, 2016 00:28 IST

वनजमी कायदा २००६ नुसार १९७८ ते ३१ डिसेंबर २००५ पुर्वी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणधारक रहिवासी घरांना आणि शेतकऱ्यांना मोफत पट्टे वाटप करण्याची तरतुद आहे.

अन्यथा जेलभरो आंदोलन : अजयराव तुमसरे यांचा इशारासाकोली : वनजमी कायदा २००६ नुसार १९७८ ते ३१ डिसेंबर २००५ पुर्वी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणधारक रहिवासी घरांना आणि शेतकऱ्यांना मोफत पट्टे वाटप करण्याची तरतुद आहे. परंतु कायद्यातील जाचक अटिंमुळे अनेक अतिक्रमीत घरांना आणि शेतजमिनीला शासनाने पट्टे दिलेले नाही. जिल्हा हा वनव्याप्त जिल्हा असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येने प्रत्येक तालुक्यात घरांकरीता आणि शेतजमिनीकरीता पिढीजात अतिक्रमण केलेले असल्यामुळे अनेक कुटूंब शासनाच्या लाभापासून वंचित आहेत. मागील फेब्रुवारी महिन्यात साकोलीमध्ये १५०० अतिक्रमण धारक कुटूंबानी डॉ. अजयराव तुमसरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साकोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून २००६ च्या अतिक्रमण कायद्यानुसार मोफत पट्टा मिळावा म्हणून सामूहिक अर्ज करण्यात आला होता. जवळपास ७० टक्के साकोली म्हणजेच संपूर्ण पंचशील वॉर्ड, शिवाजी वॉर्ड, श्रीनगर कॉलोनी, निपाने कॉलोनी, नर्सरी कॉलोनीतील काही भाग हा अतिक्रमण धारक आहे. अतिक्रमण धारकांना मोफत पट्टे वाटप कायदा २००६ नुसार सर्व अतिक्रमण धारकांना नियमानुसार मोफत पट्टे देण्याची तरतुद असुनही शासनाने अतिक्रमण धारकाकडून धनाढ्य लोकांना लाखों रूपये घेवून पट्टे दिल्याचा आरोप डॉ. तुमसरे यांनी केलेला आहे. गोरगरीब लोकांना पट्ट्याची रक्कम भरणे कठीण असल्यामुळे हे सर्व कुटंूब शासकीय लाभापासून ३०-४० वर्षापासून वंचित असल्याची खंतही व्यक्त केली. एकीकडे शासनाने वनजमीन मोफत पट्टे वाटप कायदा बनविला आणि दुसरीकडे अतिक्रमण धारकांकडून लाखों रूपयांची लुट करून पट्टे वाटप करण्याचे धोरण सुरू केले आहे. ही आर्थिक लुट बंद करून शासनात मोफत पट्टे वाटप करावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. अजयराव तुमसरे यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)