शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने ‘तो’ निर्णय रद्द करावा

By admin | Updated: July 11, 2017 00:21 IST

सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा शासनाने जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे.

बीआरएसपीची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा शासनाने जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे. यामुळे सामान्य माणुस हा त्या पदापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने याबाबत फेरविचार करुन सदर निर्णय तात्काळ रद्द करावा व निवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा लोककल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेवून दिलासा द्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.भारतीय संविधानात तरतुद केल्याप्रमाणे सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधुन बहुमताने सरपंचाची निवड केली जाते हीच पध्दत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पदाची निवड करतांना अवलंबिली जाते. परंतु शासनाने सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा व सरपंचपदासाठी १९९५ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीनांच निवडणूक लढविण्याचा आणि शैक्षणिक पात्रता सातवी असल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्याचा कुटील डाव खेळला जात आहे. यावरुन मागासवर्गीय समाजातील नागरिक अशा पदापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संविधान दत्त अधिकाराचे हनन आहे. निवडणूकीत साम,दाम, दंड भेद नितीचा वापर करण्यात येत असल्याने जो व्यक्ती कमी शिकलेला आहे पण, त्याच्याकडे आर्थिक पाठबळ आहे तो व्यक्ती या बळाचा वापर करुन तो पद हस्तगत करेल. आणि जो शिक्षीत आहे. त्याला या पदापासुन मुकावे लागेल. १९९५ नंतर जन्म झालेल्यांना निवडणूकीत उभे राहता येईल असे नमुद असल्याने १९९५ पूर्वीच्या नागरिकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. या जाचक अटीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी शासनाने वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करुन सरपंच पदाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाअध्यक्ष झेड. आर. दुधकुवर, जिल्हाप्रभारी डॉ. महेंद्र गणवीर, प्रा.मधुकर ऋषेश्वरी, संजय रामटेके, संजय गजभिये, नारद गणविर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.