शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

शासनाने ‘तो’ निर्णय रद्द करावा

By admin | Updated: July 11, 2017 00:21 IST

सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा शासनाने जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे.

बीआरएसपीची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा शासनाने जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे. यामुळे सामान्य माणुस हा त्या पदापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने याबाबत फेरविचार करुन सदर निर्णय तात्काळ रद्द करावा व निवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा लोककल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेवून दिलासा द्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.भारतीय संविधानात तरतुद केल्याप्रमाणे सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधुन बहुमताने सरपंचाची निवड केली जाते हीच पध्दत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पदाची निवड करतांना अवलंबिली जाते. परंतु शासनाने सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा व सरपंचपदासाठी १९९५ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीनांच निवडणूक लढविण्याचा आणि शैक्षणिक पात्रता सातवी असल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्याचा कुटील डाव खेळला जात आहे. यावरुन मागासवर्गीय समाजातील नागरिक अशा पदापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संविधान दत्त अधिकाराचे हनन आहे. निवडणूकीत साम,दाम, दंड भेद नितीचा वापर करण्यात येत असल्याने जो व्यक्ती कमी शिकलेला आहे पण, त्याच्याकडे आर्थिक पाठबळ आहे तो व्यक्ती या बळाचा वापर करुन तो पद हस्तगत करेल. आणि जो शिक्षीत आहे. त्याला या पदापासुन मुकावे लागेल. १९९५ नंतर जन्म झालेल्यांना निवडणूकीत उभे राहता येईल असे नमुद असल्याने १९९५ पूर्वीच्या नागरिकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. या जाचक अटीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी शासनाने वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करुन सरपंच पदाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाअध्यक्ष झेड. आर. दुधकुवर, जिल्हाप्रभारी डॉ. महेंद्र गणवीर, प्रा.मधुकर ऋषेश्वरी, संजय रामटेके, संजय गजभिये, नारद गणविर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.