शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शासकीय कार्यालयांचे रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:46 IST

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे.

ठळक मुद्देजलपातळी खालावली : भविष्यात पाणीटंचाईची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे. छतावरील पावसाचे पाणी अडवून ही योजना अंमलात आणल्यास भविष्यात पाणी टंचाईची झळ कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा पुढील काळात मानवाला आॅक्सिजनप्रमाणेच पाण्याचीही तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून भूगर्भातील जलपातळी खालावत चालली आहे. त्यावर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना कायमस्वरुपी राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे प्रशासनासह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. भंडारा जिल्हा नदी, नाले, विहिरी, कुपनलिका, तलाव हे पाण्याचे मुुख्य स्त्रोत आहेत.जिल्ह्यातून वैनगंगा नदीसह सुर, चुलबंध, बावनथडी या छोट्या नद्या वाहतात. याच नदी, नाल्यांच्या स्त्रोतांपासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी थेट वाहून जात आहे. त्याला कुठेच अडविण्यात येत नाही. मोठे बंधारे नाहीत, की धरणे नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून तालुक्यातील पाण्याची पातळी खालावत आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात असल्यामुळे पाण्याचे स्रोत कोरडे पडत आहे.लहान नद्याही आता कोरड्या पडत आहे. यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता बळावली आहे. पाण्याची अशी नासाडी होत असताना जिल्ह्याला पाणी समस्येने ग्रासले आहे. त्यामुळेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने तालुक्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता मान्सून पूर्वीच शहरी व ग्रामीण भागात रेन हॉर्वेस्टिंग योजना राबविणे काळाची गरज बनली आहे. ही योजना सर्वत्र सक्तीने राबविल्यास पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज आहे. यामुळे जमिनीचा खालावलेला पाणी स्त्रोत वाढू शकतो. भविष्यातील उन्हाळ्यात काही नाले, नदी, विहिरी, तलाव कोरडे पडणार नाहीत.