शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

शासकीय कार्यालयांचे रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:46 IST

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे.

ठळक मुद्देजलपातळी खालावली : भविष्यात पाणीटंचाईची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे. छतावरील पावसाचे पाणी अडवून ही योजना अंमलात आणल्यास भविष्यात पाणी टंचाईची झळ कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा पुढील काळात मानवाला आॅक्सिजनप्रमाणेच पाण्याचीही तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून भूगर्भातील जलपातळी खालावत चालली आहे. त्यावर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना कायमस्वरुपी राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे प्रशासनासह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. भंडारा जिल्हा नदी, नाले, विहिरी, कुपनलिका, तलाव हे पाण्याचे मुुख्य स्त्रोत आहेत.जिल्ह्यातून वैनगंगा नदीसह सुर, चुलबंध, बावनथडी या छोट्या नद्या वाहतात. याच नदी, नाल्यांच्या स्त्रोतांपासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी थेट वाहून जात आहे. त्याला कुठेच अडविण्यात येत नाही. मोठे बंधारे नाहीत, की धरणे नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून तालुक्यातील पाण्याची पातळी खालावत आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात असल्यामुळे पाण्याचे स्रोत कोरडे पडत आहे.लहान नद्याही आता कोरड्या पडत आहे. यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता बळावली आहे. पाण्याची अशी नासाडी होत असताना जिल्ह्याला पाणी समस्येने ग्रासले आहे. त्यामुळेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने तालुक्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता मान्सून पूर्वीच शहरी व ग्रामीण भागात रेन हॉर्वेस्टिंग योजना राबविणे काळाची गरज बनली आहे. ही योजना सर्वत्र सक्तीने राबविल्यास पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज आहे. यामुळे जमिनीचा खालावलेला पाणी स्त्रोत वाढू शकतो. भविष्यातील उन्हाळ्यात काही नाले, नदी, विहिरी, तलाव कोरडे पडणार नाहीत.