शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

शासकीय कार्यालयांचे रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:46 IST

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे.

ठळक मुद्देजलपातळी खालावली : भविष्यात पाणीटंचाईची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे. छतावरील पावसाचे पाणी अडवून ही योजना अंमलात आणल्यास भविष्यात पाणी टंचाईची झळ कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा पुढील काळात मानवाला आॅक्सिजनप्रमाणेच पाण्याचीही तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून भूगर्भातील जलपातळी खालावत चालली आहे. त्यावर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना कायमस्वरुपी राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे प्रशासनासह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. भंडारा जिल्हा नदी, नाले, विहिरी, कुपनलिका, तलाव हे पाण्याचे मुुख्य स्त्रोत आहेत.जिल्ह्यातून वैनगंगा नदीसह सुर, चुलबंध, बावनथडी या छोट्या नद्या वाहतात. याच नदी, नाल्यांच्या स्त्रोतांपासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी थेट वाहून जात आहे. त्याला कुठेच अडविण्यात येत नाही. मोठे बंधारे नाहीत, की धरणे नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून तालुक्यातील पाण्याची पातळी खालावत आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात असल्यामुळे पाण्याचे स्रोत कोरडे पडत आहे.लहान नद्याही आता कोरड्या पडत आहे. यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता बळावली आहे. पाण्याची अशी नासाडी होत असताना जिल्ह्याला पाणी समस्येने ग्रासले आहे. त्यामुळेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने तालुक्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता मान्सून पूर्वीच शहरी व ग्रामीण भागात रेन हॉर्वेस्टिंग योजना राबविणे काळाची गरज बनली आहे. ही योजना सर्वत्र सक्तीने राबविल्यास पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज आहे. यामुळे जमिनीचा खालावलेला पाणी स्त्रोत वाढू शकतो. भविष्यातील उन्हाळ्यात काही नाले, नदी, विहिरी, तलाव कोरडे पडणार नाहीत.