शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरकारने केला शेतकरी, बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: May 30, 2017 00:23 IST

वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे.

बंडूभाऊ सावरबांधे : भंडाऱ्यात काँग्रेसचे धरणे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे. शासनाने शेतकरी व बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा केला. देशातील बंधुभाव पायदळी तुडवून देशाला मागे नेण्याचे काम हे केंद्र व राज्य शासन करीत आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी केला. शासनच्या निषेधार्थ येथील त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्यावतीने आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शाश्वत विकासाचे फसवे गाजर दाखवून देशभरातील जनतेचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निषेध केला.देशातील नागरिकांना भूलथापा देऊन केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. हे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्ष झाले. परंतु, निवडून येण्यापूर्वी मोदी यांनी जनतेला जी आश्वासने दिली, ती आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करीत असून महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्षवरील तसेच सरकारवरचा विश्वास उडाला आहे. भाजप सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या काळात जनता भाजपला धडा शिकवेल, असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. निवेदन देताना माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितिरमारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मनोहर सिंगनजुडे, सभापती विनायक बुरडे, धनराज साठवणे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, शंकर राऊत, भूमेश्वर महावाडे, सभापती नीलकंठ कायतें, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वणवे, अनिक जमा पटेल, गणेश निमजे, महेंद्र निंबार्ते, नगराध्यक्ष स्वाती निमजे, मंगेश हुमने, भावना शेंडे, छाया पटले, जनार्धन निंबार्ते, दिनेश बोंदे्रे, प्रा मारबते, प्रीती बागडे, मिसाराम चोपकर, स्नेहल रोडगे,प्रवीण भोंदे, लांजेवार, आशिष पात्रे, जि.प.सदस्य के.के.पंचबुद्धे, एस टी गिऱ्हेपुंजे, अश्विन नाशिने, संजय वरगंटीवार, अरुण श्रीपाद, सुषमा वरगंटीवार, दिनेश गिऱ्हेपुंजे, सचिन फाले, विवेक गायधने उपस्थित होते. संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन अजय गडकरी यांनी केले.