शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शासन निर्णय शिक्षकांच्या ‘मानगुटीवर’

By admin | Updated: September 23, 2015 00:43 IST

शिक्षण विभाग पारदर्शक करण्यासोबतच त्यांची सर्व माहिती संगणकावर जोडण्याची प्रक्रिया शिक्षण विभाग राबवित असून ...

वेतनाला विलंब : आॅनलाईनमुळे वेतनाचे बिल रखडलेप्रशांत देसाई भंडाराशिक्षण विभाग पारदर्शक करण्यासोबतच त्यांची सर्व माहिती संगणकावर जोडण्याची प्रक्रिया शिक्षण विभाग राबवित असून सर्व शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, संगणक प्रणाली अद्ययावत झाली नसल्यामुळे शिक्षकांचे वेतन बील स्वीकारण्यात अडचणी निर्माण होत आहे. परिणामी वेतनास विलंब होत असल्यामुळे शासनाचा हा निर्णय शिक्षकांच्याच मुळावर बसला आहे.शिक्षण विभाग आॅनलाईन करण्याचा ध्यास राज्य शासनाने घेतला. मात्र, नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे आॅनलाईन प्रक्रिया वारंवार बंद पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारवीपर्यंतच्या ३,२६७ शिक्षकाचे वेतन प्रकरणात अडथळा निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने सध्या संचमान्यता, सरल, वेतनाची बिले आॅनलाईनने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संपूर्ण प्रणाली अद्ययावत झालेली नाही.वेबसाईट वेळोवेळी बंद असल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आॅगस्ट महिन्याचे वेतन २० दिवसांनतर मिळाले आहे. शिक्षक सध्या सरलच्या कामात व्यस्त आहे. शालार्थ, सरलची वेबसाईट वारंवार ‘हॅक’ होत असल्याने ती शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिक्षकांचे वेतन बील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर आहे. १५ तारखेपर्यंत वेतन देयक तपासून गटशिक्षणाधिकारी फॉरवर्ड करतील. १६ ते १९ पर्यंत शिक्षणाधिकारी वेतन वेतन बिलाचे बीडीएस काढतील. २० ते २१ पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेणे व २२ ते २५ तारखेपर्यंत अर्थ विभागाकडून कोषागार कार्यालयाकडे पाठविणे असे शालार्थ वेतन प्रणालीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने तयार केले आहे. मात्र, वेबसाईट ‘हॅक’ असल्याने सप्टेंबर महिन्याच्या वेतन देयकाची आॅनलाईन प्रक्रिया रखडल्यामुळे पुढील महिन्यात वेळेवर वेतन मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.जिल्ह्यातील ३,२६७ शिक्षकांना फटकाशिक्षकांच्या वेतनाची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागाने टीसीएस कंपनीकडून वेबसाईट बनविली आहे. मात्र, वेबसाईट हॅक होत असल्यामुळे आॅनलाईन वेतन देयके स्वीकारण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारीवीच्या ३ हजार २६७ शिक्षकांचे वेतन वीस दिवस विलंबाने झाले. यापूर्वी शिक्षकांचे वेतन पाच तारखेला व्हायचे, हे विशेष.शासन निर्णय काय म्हणतो?राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीने महिन्याच्या पहिल्या तारखेला अदा करावयाचे आहे. विलंब झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संगणक प्रणालीच्या अडथळ्यामुळे शिक्षकांना वेतन विलंबाने मिळाले असून शिक्षणाधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.आॅनलाईन प्रणालीचा जिल्ह्यात कुठलीही अडचण नाही. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे आॅगस्ट महिन्याचे वेतन वेळेत देण्यात आले. कुणाचेही वेतन थकीत नाही.- किसन शेंडेशिक्षणाधिकारी (माध्य.), भंडारा.वेतनाला विलंब होत असल्याने सोसायटीतून काढलेल्या कर्जावर व्याज वाढत आहे. वेतनाच्या विलंबाला शिक्षणाधिकारी जबाबदार असून शिक्षक संघ आंदोलन करले.- मुबारक सैय्यदजिल्हाध्यक्ष, प्रा. शि.संघ, भंडारा.