शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित स्वतंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित स्वतंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस.बी. भलावी, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. सोबतच ७५ खाटांचे रुग्णालय असणार आहे. आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून ३४.२४ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आल्याचे सांगितले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला आहे. सामान्य रुग्णालय येथे पेडियाट्रिक वाॅर्ड तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोरोनावर सध्या तरी ‘लस’ हे एकमेव औषध असून नागरिकांनी लस अवश्य घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू आहे. कर्जमुक्तीपासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी सुरू केलेल्या खावटी अनुदान योजनेत लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप सुरू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांना विहित मुदतीत मजुरी वाटप करण्यामध्ये व नोंदणीकृत मजुरांचे आधारकार्ड नरेगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यामध्ये भंडारा जिल्हा राज्यात प्रथम आहे. मत्स्यव्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादनासोबतच मत्स्यव्यवसायाची पूरक व्यवसाय म्हणून निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सी.सी.टी.एन.एस. प्रणाली राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रणालीच्या आधारे भंडारा पोलीस विभागाने उत्तम काम करून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

भंडारा जिल्ह्यात निसर्ग पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य स्थळांना भेटी देत आहेत. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहोचविण्याची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावर खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.

या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन स्मिता गालफडे व मुकुंद ठवकर यांनी केले.

बॉक्स

ई-पीक पाहणी प्रकल्प लाभदायक ठरेल.

ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी झाला असून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा नुकताच शुभारंभ झाला आहे. ई-पीक पाहणीमुळे पिकांच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प शेतकरी बांधवांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.