शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शासन शेतकऱ्यांच्या संपाबाबत गंभीर नाही

By admin | Updated: June 3, 2017 00:21 IST

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी बांधवांनी राज्यव्यापी संप सुरु केला आहे. शेतकऱ्यांना विविध पक्ष व संघटना सशर्त पाठिंबा देत आहेत.

नरेश डहारे यांचा आरोप : कर्जमुक्ती करणे गरजचेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी बांधवांनी राज्यव्यापी संप सुरु केला आहे. शेतकऱ्यांना विविध पक्ष व संघटना सशर्त पाठिंबा देत आहेत. कृषी प्रधान भारत देशातील व पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांवर संपावर जाण्याची वेळ यावी हे दुर्दैव असून सत्ताधाऱ्यांचे नाकर्तेपण ठरते. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्याबाबत गंभीर नसून हे शासन भारतीयांचे की इंग्रजांचे की अन्य कोणाचे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून शेतकरी बांधवांच्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सशर्थ पाठींबा असून वेळप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून जिल्हाभर आंदोलन करेल. वेळप्रसंगी खासदार, आमदार व मंत्र्यांना गावबंदी करू, या बाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील. असा इशारा कृषी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश डहारे यांनी दिला आहे.राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेतमाल हमी भाव मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक विवंचनेमुळे तसेच सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कर्जाची परतफेड करता येत नसल्याने नाईलाजास्तव आत्महत्या करावी लागते. हे फार मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे व त्यांच्या समस्या सोडविण्यास टाळाटाळ करणे, शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना एकाच दावणीला बांधून त्यांची मुस्कटदाबी करणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले पाहिजे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु तीन वर्षाच्या काळात शेतकरी हिताचे धोरण झाले नसल्याने, शेतकरी मेटाकुटीस आले असून नागवले जात आहेत. सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारला शेतकरी बांधवांची चिंता आहे की आणखी कोणाची चिंता आहे याचा जाहीर खुलासा करावा.संपावर जाण्यापूर्वी शासन प्रशासानाने समन्वय साधून व सम्यक विचार करून समाधानकारक तोडगा काढला असता तर शेतकरी बांधवांना संपावर जाण्याची वेळ आली नसती. परंतु शासनाने उलट खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संपावर जाऊ दिले. यामुळे जनजीवन ढवळून निघत आहे. ही लोकशाही नसून दंडूकशाही आहे, असे दिसून येत आहे. शासन प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या भावनांचा अंत पाहू नये. सदर संपाबाबद शक्य तितक्या लवकर समाधानकारक तोडगा काढून दिलासा द्यावा; मात्र याकडे शासन प्रशासनाने हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष केले तर याविरोधात नाईलाजास्तव संपूर्ण शेतकरी तुतारी व आसुड घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व वेळप्रसंगी खासदार, आमदार, मंत्र्यांनाही गावबंदी, तालुकाबंदी व जिल्हाबंधी करण्यात येईल असा इशाराही नरेश डहारे यांनी दिला आहे.