शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शासन शेतकऱ्यांच्या संपाबाबत गंभीर नाही

By admin | Updated: June 3, 2017 00:21 IST

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी बांधवांनी राज्यव्यापी संप सुरु केला आहे. शेतकऱ्यांना विविध पक्ष व संघटना सशर्त पाठिंबा देत आहेत.

नरेश डहारे यांचा आरोप : कर्जमुक्ती करणे गरजचेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी बांधवांनी राज्यव्यापी संप सुरु केला आहे. शेतकऱ्यांना विविध पक्ष व संघटना सशर्त पाठिंबा देत आहेत. कृषी प्रधान भारत देशातील व पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांवर संपावर जाण्याची वेळ यावी हे दुर्दैव असून सत्ताधाऱ्यांचे नाकर्तेपण ठरते. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्याबाबत गंभीर नसून हे शासन भारतीयांचे की इंग्रजांचे की अन्य कोणाचे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून शेतकरी बांधवांच्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सशर्थ पाठींबा असून वेळप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून जिल्हाभर आंदोलन करेल. वेळप्रसंगी खासदार, आमदार व मंत्र्यांना गावबंदी करू, या बाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील. असा इशारा कृषी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश डहारे यांनी दिला आहे.राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेतमाल हमी भाव मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक विवंचनेमुळे तसेच सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कर्जाची परतफेड करता येत नसल्याने नाईलाजास्तव आत्महत्या करावी लागते. हे फार मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे व त्यांच्या समस्या सोडविण्यास टाळाटाळ करणे, शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना एकाच दावणीला बांधून त्यांची मुस्कटदाबी करणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले पाहिजे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु तीन वर्षाच्या काळात शेतकरी हिताचे धोरण झाले नसल्याने, शेतकरी मेटाकुटीस आले असून नागवले जात आहेत. सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारला शेतकरी बांधवांची चिंता आहे की आणखी कोणाची चिंता आहे याचा जाहीर खुलासा करावा.संपावर जाण्यापूर्वी शासन प्रशासानाने समन्वय साधून व सम्यक विचार करून समाधानकारक तोडगा काढला असता तर शेतकरी बांधवांना संपावर जाण्याची वेळ आली नसती. परंतु शासनाने उलट खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संपावर जाऊ दिले. यामुळे जनजीवन ढवळून निघत आहे. ही लोकशाही नसून दंडूकशाही आहे, असे दिसून येत आहे. शासन प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या भावनांचा अंत पाहू नये. सदर संपाबाबद शक्य तितक्या लवकर समाधानकारक तोडगा काढून दिलासा द्यावा; मात्र याकडे शासन प्रशासनाने हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष केले तर याविरोधात नाईलाजास्तव संपूर्ण शेतकरी तुतारी व आसुड घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व वेळप्रसंगी खासदार, आमदार, मंत्र्यांनाही गावबंदी, तालुकाबंदी व जिल्हाबंधी करण्यात येईल असा इशाराही नरेश डहारे यांनी दिला आहे.