शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचा जलस्तर २४० मीटर होणार

By admin | Updated: September 30, 2014 23:32 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे.

धरणाची ३३ वक्रद्वारे बंद : हजारो हेक्टर शेती पाण्याखालीगोसेबुज : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे. काल रात्रीपासून धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे बंद करण्यात आले आहेत. आज धरणाचा जलस्तर ५ से.मी. ने वाढून ते २३९.९०० मिटर झाला आहे.२४० मिटरवर भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगाव सोडले तर कोणत्याही गावाला धोका नाही. पण नागपूर जिल्ह्यातील अनेक गावात धरणाचे पाणी शिरले आहे. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती धरणाच्या पाण्याखाली गेली आहे. पाथरी मध्ये एक एक घर गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात बुडत आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने घरे पाण्याखाली आले आहेत. जलस्तर वाढविण्याची वेळ, धानाच्या पिकाची वेळ, सणासुदीची वेळ व प्रकल्पग्रस्त गाव सोडण्याची वेळ एकाच वेळेस आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना गाव रिकामे करण्याकरिता मोठ्या अडचणी येत आहेत. या गावातील ४३८ कुटुंब धरणाच्या पाण्याने बाधीत होणार आहेत. जुन्या गावात अजूनही ३० कुटुंब राहत आहेत. पाथरी व बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांनी पुढे दसरा, दिवाळी व इतर सण असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला नवीन गावठाणात स्थानांतरण होईपर्यंत स्थगीती देण्याची मागणी केली होती. नवीन गावठाणात स्थानांतरण करून प्रकल्पग्रस्त सरकारला सहकार्य करीत आहेत. पण सरकार प्रकल्पग्रस्तांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून धरणाचा जलस्तर वाढवित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत असंतोष पसरत आहे. धरणाचा जलस्तर २४०.२०० मीटर पर्यंत गेल्यास गावातील मुख्य रस्ता बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जुन्या घरातील साहित्य काढण्याकरिता फार अडचणी येणार आहेत. सध्या प्रकल्पग्रस्त घरातील साहित्य काढण्या मात्र व्यस्त आहेत. सावरगावात चारही बाजूने पाणी झाले असून ईटगाव कडे जाणारा एकमात्र रस्ता सुरु आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांनी गाव सोडले असून ३ कुटुंब त्यांची शेती गावाजवळ असल्यामुळे राहत आहेत. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, नवेगाव, सिर्सी, कोच्छी, पिपरी आदी गावात धरणाचे पाणी शिरले आहे. ज्या प्रकारे जलस्तर वाढविला जाईल त्या प्रामणे बुडीत क्षेत्रातील गावे रिकामे करण्याला गती येणार आहे. गावे रिकामी करण्याकरिता प्रकल्पग्रस्त सहकार्य करीत असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला मदत होत आहे. (वार्ताहर)