शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आसोला मेंढा तलावात सोडले गोसेखुर्दचे पाणी

By admin | Updated: September 13, 2015 00:28 IST

पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे.

पवनी/गोसेखुर्द : पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतीला गोसीखुर्द धरणाच्या पाण्याने सिंचन होण्याकरीता गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. ९९ कि.मी. लांबीच्या या कालव्यातून गोसीखुर्द धरणाचे पाणी आज संध्याकाळ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा तलावात पोहचणार आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचन, पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा व जल विद्युत निर्मिती होणार आहे. शासनाने ठरविल्या प्रमाणे गोसीखुर्द धरणाद्वारे ‘वैनगंगेचे पाणी शेतकऱ्यांचे अंगणी’ पोहचविण्याचे धोरण आहे.गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे एकुण ९९ कि.मी. पर्यंतची कामे सुरु असून मातीकाम व बांधकामे बहुतांश पुर्ण झालेली आहेत. या कालव्याच्या कामाची किंमत ५,१८९ कोटी आहे. उजव्या कालव्याद्वारे ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मार्च २०१५ अखेर ९,४२० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४,४०२ हेक्टर सिंचनक्षमतेचे उद्दीष्ट आहे. सन २०१४-१५ मध्ये १,२७२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन करण्यात आले आहे.शेतीला गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात देवून सिंचन करण्याकरीता नियोजन करण्यात येत आहे. या करीता धरणाच्या उजव्या कालव्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील आसोलामेंढा तलावात पाणी सोडण्याचे ठरविण्यात आले. याकरीता मागील आठ दिवसापासून धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे बंद करून धरणातील जलस्तर वाढविला जात आहे. मागील दोन दिवसांपासून उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. आज शनिवारला सकाळी ११ वाजता ७० कि.मी. अंतरापर्यंत पाणी पोहचले होते. संध्याकाळी ९९ कि.मी. अंतरावरील आसोलामेंढा तलावात पाणी पोहचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय होणार आहे. (शहर प्रतिनीधी/वार्ताहर)