शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

आसोला मेंढा तलावात सोडले गोसेखुर्दचे पाणी

By admin | Updated: September 13, 2015 00:28 IST

पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे.

पवनी/गोसेखुर्द : पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतीला गोसीखुर्द धरणाच्या पाण्याने सिंचन होण्याकरीता गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. ९९ कि.मी. लांबीच्या या कालव्यातून गोसीखुर्द धरणाचे पाणी आज संध्याकाळ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा तलावात पोहचणार आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचन, पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा व जल विद्युत निर्मिती होणार आहे. शासनाने ठरविल्या प्रमाणे गोसीखुर्द धरणाद्वारे ‘वैनगंगेचे पाणी शेतकऱ्यांचे अंगणी’ पोहचविण्याचे धोरण आहे.गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे एकुण ९९ कि.मी. पर्यंतची कामे सुरु असून मातीकाम व बांधकामे बहुतांश पुर्ण झालेली आहेत. या कालव्याच्या कामाची किंमत ५,१८९ कोटी आहे. उजव्या कालव्याद्वारे ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मार्च २०१५ अखेर ९,४२० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४,४०२ हेक्टर सिंचनक्षमतेचे उद्दीष्ट आहे. सन २०१४-१५ मध्ये १,२७२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन करण्यात आले आहे.शेतीला गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात देवून सिंचन करण्याकरीता नियोजन करण्यात येत आहे. या करीता धरणाच्या उजव्या कालव्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील आसोलामेंढा तलावात पाणी सोडण्याचे ठरविण्यात आले. याकरीता मागील आठ दिवसापासून धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे बंद करून धरणातील जलस्तर वाढविला जात आहे. मागील दोन दिवसांपासून उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. आज शनिवारला सकाळी ११ वाजता ७० कि.मी. अंतरापर्यंत पाणी पोहचले होते. संध्याकाळी ९९ कि.मी. अंतरावरील आसोलामेंढा तलावात पाणी पोहचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय होणार आहे. (शहर प्रतिनीधी/वार्ताहर)