शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आसोला मेंढा तलावात सोडले गोसेखुर्दचे पाणी

By admin | Updated: September 13, 2015 00:28 IST

पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे.

पवनी/गोसेखुर्द : पाऊस समाधानकारक पडला नसल्यामुळे पुर्व विदर्भातील शेतकरी चिंतामग्न झालेले आहेत. धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतीला गोसीखुर्द धरणाच्या पाण्याने सिंचन होण्याकरीता गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. ९९ कि.मी. लांबीच्या या कालव्यातून गोसीखुर्द धरणाचे पाणी आज संध्याकाळ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा तलावात पोहचणार आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचन, पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा व जल विद्युत निर्मिती होणार आहे. शासनाने ठरविल्या प्रमाणे गोसीखुर्द धरणाद्वारे ‘वैनगंगेचे पाणी शेतकऱ्यांचे अंगणी’ पोहचविण्याचे धोरण आहे.गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे एकुण ९९ कि.मी. पर्यंतची कामे सुरु असून मातीकाम व बांधकामे बहुतांश पुर्ण झालेली आहेत. या कालव्याच्या कामाची किंमत ५,१८९ कोटी आहे. उजव्या कालव्याद्वारे ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मार्च २०१५ अखेर ९,४२० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४,४०२ हेक्टर सिंचनक्षमतेचे उद्दीष्ट आहे. सन २०१४-१५ मध्ये १,२७२ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन करण्यात आले आहे.शेतीला गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात देवून सिंचन करण्याकरीता नियोजन करण्यात येत आहे. या करीता धरणाच्या उजव्या कालव्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील आसोलामेंढा तलावात पाणी सोडण्याचे ठरविण्यात आले. याकरीता मागील आठ दिवसापासून धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे बंद करून धरणातील जलस्तर वाढविला जात आहे. मागील दोन दिवसांपासून उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. आज शनिवारला सकाळी ११ वाजता ७० कि.मी. अंतरापर्यंत पाणी पोहचले होते. संध्याकाळी ९९ कि.मी. अंतरावरील आसोलामेंढा तलावात पाणी पोहचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय होणार आहे. (शहर प्रतिनीधी/वार्ताहर)