शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

सभा रद्द झाल्याने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 00:15 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आयोजित सभेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी केले होते.

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आयोजित सभेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी केले होते. मात्र तेच सभेत न पोहचल्यामुळे सभा रद्द झाली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड झाला. त्यानंतर आमदारांविरुद्ध संताप व्यक्त करुन प्रकल्पग्रस्त आल्यापावली गावाकडे परतले.आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी सभा आयोजित केली होती. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात सादर केल्या. अर्ज मिळाल्याची पावतीसुध्दा प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली. आज सकाळपासूनच प्रकल्पग्रस्तांनी सभा असल्यामुळे भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकत्रित झाले होते. यात चिचाळ, सौदड, खापरी, नेरला, मौदी, सुरेवाडा, कोरंभी(भंडारा), वडद, जामगाव, जाख यासह जवळपास १५ गावातील प्रकल्पग्रस्तांचा समावेश होता. प्रकल्पग्रस्तांनी सभेची दोन वाजतापर्यत वाट पाहिली. वेळ झाल्यानंतरही सभा सुरु झाली नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी विचारपूस केली असता सभा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड झाला. संताप व्यक्त करुन सभा रद्द करायची होती तर तशी सूचना प्रकल्पग्रस्तांना का दिली नाही. हातातले काम सोडून सभेत सहभागी होण्यासाठी आल्याचेही अनेक प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. यावेळी शेखर रामटेके, राधेशाम भाजिपाले, प्रदीप भुरे, श्रीधर पंचभाई, गुरुदास मेश्राम, केशव नखाते, मोहनलाल मेश्राम, रमेश लेंडे, महादेव कुरंजेकर, चंद्रभान वंजारी, सुर्यभान वंजारी, वाल्मीक नागपुरे, कला चामलाटे, अंकुश आंबाघरे, मिताराम उके, आसाराम उके, ताराचंद आंबाघरे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गुरुवारला आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र जिल्हाधिकारी धीरजकुमार हे विभागीय आयुक्तांनी आयोजित केलेल्या नागपूर येथील सभेत सहभागी झाल्याने आढावा बैठक वेळेवर रद्द करण्यात आली. रद्द केलेली सभा लवकरच घेण्यात येईल. - अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आमदार, भंडारा.