शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

राष्ट्रीय प्रकल्पामधून गोसीखुर्द वगळले

By admin | Updated: August 19, 2016 00:36 IST

पूर्व विदर्भासाठी हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पांच्या यादीमधून वगळून विदर्भाचे मोठे नुकसान केंद्र शासनाने केले आहे.

पत्रपरिषद : प्रफुल पटेल यांची माहिती पवनी : पूर्व विदर्भासाठी हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पांच्या यादीमधून वगळून विदर्भाचे मोठे नुकसान केंद्र शासनाने केले आहे. प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची क्षमता राज्य शासनाची नाही. त्यामुळे राष्ट्रीय प्रकल्पात समावेश करून केंद्राचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे कार्य आपण केलेले होते, अशी माहिती राज्यसभा सदस्य तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी पत्रपरिषदेत दिली. अच्छे दिनची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या समस्यांना समजून घेतले नाही. शेतमालाला भाव, भारनियमन सिंचनाच्या सोयी याकडे शासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास साधला जातो, परंतु गोंदिया-भंडारा-रामटेक क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाकरीता मंजूर केलेला निधी नामंजुर करण्याचे धाडस या सरकारने केले. यावरून विकास प्रत्यक्ष न करता स्वप्न तेवढे दाखविले जात आहे. पवनी तालुक्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बाधीत गावांचा प्रश्न, त्यांच्यावर होणारे हिस्त्र प्राण्यांचे हल्ले यावर चिंता व्यक्त करून केंद्र शासनाकडे गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेटनार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. नागपूर-नागभिड नॅरोगेज रेल्वेचे ब्राडगेजमध्ये रूपातंर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र अशा काही समस्या निवडणून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींनी हाताळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिला. पत्रपरिषदेला आ. राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, राष्ट्रवादी काँगे्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी उपाध्यक्ष पंढरी सावरबांधे, शहराध्यक्ष डॉ. अनिल धकाते व पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)