शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेच्या बॅकवाॅटरने भंडारा जिल्ह्यातील वरठीत नळाला येतेय काळे-पिवळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 07:45 IST

Bhandara News गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे.

ठळक मुद्दे२० हजारांवर नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

भंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे. नाग नदीच्या दूषित पाण्याचा फटका बसत असून, २० हजारांवर नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या प्रकाराची तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी वरठीत धाव घेतली.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे जिल्ह्यातील पहिले जलशुद्धिकरण केंद्र वरठी येथे २०२१मध्ये सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून जवळपास २० हजार नागरिकांना २,२०० नळजोडणीच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा केला जात होता. वैनगंगा नदीच्या तीरावर खमाटा येथे नळ योजनेची विहीर असून, पाचगाव फाट्यावर जलशुद्धिकरण केंद्र आहे. मात्र, गत आठ दिवसांपासून नळाला येणारे पाणी पिवळसर - काळसर असल्याचे दिसून आले. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर हा प्रकार सुरू असल्याने ग्रामपंचायतीकडे तक्रार देण्यात आली. ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाला असेल म्हणून शोधाशोध केली. तुरटी, ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याचा प्रकार केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंगळवारी तक्रार दाखल केली. बुधवारी अभियंता दिनेश देवगडे, शाखा अभियंता खेडकर यांनी वरठी येथे येऊन जलशुद्धिकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी सरपंच श्वेता येळणे, सदस्य सीमा डोंगरे, ग्रामविकास अधिकारी दिगांबर गभणे आदी उपस्थित होते. जलशुद्धिकरण केंद्राच्या पाण्यावरही हिरवा तवंग आला असून, पाणी काळसर दिसत आहे. बॅक वाॅटरमुळेच वरठी येथे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती पुढे आली. पाण्यात लोहाची मात्रा अधिक असून, ब्लिचिंगच्या संपर्कात आल्याने पाणी पिवळे होत असल्याची माहिती देण्यात आली.

पाण्याची पर्यायी व्यवस्थाच नाही

वरठी हे २० हजार लोकसंख्येचे गाव असून, येथे सनफ्लॅग हा मोठा उद्योग आहे. नळयोजनेचे पाणी येथील नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे. गावात असलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण