शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

गोसेच्या बॅकवाॅटरने भंडारा जिल्ह्यातील वरठीत नळाला येतेय काळे-पिवळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 07:45 IST

Bhandara News गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे.

ठळक मुद्दे२० हजारांवर नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

भंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे. नाग नदीच्या दूषित पाण्याचा फटका बसत असून, २० हजारांवर नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या प्रकाराची तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी वरठीत धाव घेतली.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे जिल्ह्यातील पहिले जलशुद्धिकरण केंद्र वरठी येथे २०२१मध्ये सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून जवळपास २० हजार नागरिकांना २,२०० नळजोडणीच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा केला जात होता. वैनगंगा नदीच्या तीरावर खमाटा येथे नळ योजनेची विहीर असून, पाचगाव फाट्यावर जलशुद्धिकरण केंद्र आहे. मात्र, गत आठ दिवसांपासून नळाला येणारे पाणी पिवळसर - काळसर असल्याचे दिसून आले. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर हा प्रकार सुरू असल्याने ग्रामपंचायतीकडे तक्रार देण्यात आली. ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाला असेल म्हणून शोधाशोध केली. तुरटी, ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याचा प्रकार केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंगळवारी तक्रार दाखल केली. बुधवारी अभियंता दिनेश देवगडे, शाखा अभियंता खेडकर यांनी वरठी येथे येऊन जलशुद्धिकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी सरपंच श्वेता येळणे, सदस्य सीमा डोंगरे, ग्रामविकास अधिकारी दिगांबर गभणे आदी उपस्थित होते. जलशुद्धिकरण केंद्राच्या पाण्यावरही हिरवा तवंग आला असून, पाणी काळसर दिसत आहे. बॅक वाॅटरमुळेच वरठी येथे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती पुढे आली. पाण्यात लोहाची मात्रा अधिक असून, ब्लिचिंगच्या संपर्कात आल्याने पाणी पिवळे होत असल्याची माहिती देण्यात आली.

पाण्याची पर्यायी व्यवस्थाच नाही

वरठी हे २० हजार लोकसंख्येचे गाव असून, येथे सनफ्लॅग हा मोठा उद्योग आहे. नळयोजनेचे पाणी येथील नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे. गावात असलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण