शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

गोसेच्या बॅकवाॅटरने भंडारा जिल्ह्यातील वरठीत नळाला येतेय काळे-पिवळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 07:45 IST

Bhandara News गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे.

ठळक मुद्दे२० हजारांवर नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

भंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे. नाग नदीच्या दूषित पाण्याचा फटका बसत असून, २० हजारांवर नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या प्रकाराची तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी वरठीत धाव घेतली.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे जिल्ह्यातील पहिले जलशुद्धिकरण केंद्र वरठी येथे २०२१मध्ये सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून जवळपास २० हजार नागरिकांना २,२०० नळजोडणीच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा केला जात होता. वैनगंगा नदीच्या तीरावर खमाटा येथे नळ योजनेची विहीर असून, पाचगाव फाट्यावर जलशुद्धिकरण केंद्र आहे. मात्र, गत आठ दिवसांपासून नळाला येणारे पाणी पिवळसर - काळसर असल्याचे दिसून आले. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर हा प्रकार सुरू असल्याने ग्रामपंचायतीकडे तक्रार देण्यात आली. ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाला असेल म्हणून शोधाशोध केली. तुरटी, ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याचा प्रकार केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंगळवारी तक्रार दाखल केली. बुधवारी अभियंता दिनेश देवगडे, शाखा अभियंता खेडकर यांनी वरठी येथे येऊन जलशुद्धिकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी सरपंच श्वेता येळणे, सदस्य सीमा डोंगरे, ग्रामविकास अधिकारी दिगांबर गभणे आदी उपस्थित होते. जलशुद्धिकरण केंद्राच्या पाण्यावरही हिरवा तवंग आला असून, पाणी काळसर दिसत आहे. बॅक वाॅटरमुळेच वरठी येथे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती पुढे आली. पाण्यात लोहाची मात्रा अधिक असून, ब्लिचिंगच्या संपर्कात आल्याने पाणी पिवळे होत असल्याची माहिती देण्यात आली.

पाण्याची पर्यायी व्यवस्थाच नाही

वरठी हे २० हजार लोकसंख्येचे गाव असून, येथे सनफ्लॅग हा मोठा उद्योग आहे. नळयोजनेचे पाणी येथील नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे. गावात असलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण