शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

गोसेखुर्दच्या ‘बॅक वॉटर’चा फटका

By admin | Updated: October 8, 2014 23:20 IST

गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा

कारधावासीयांमध्ये रोष : पुनर्वसनाची प्रक्रिया १५ वर्षांपासून रखडलीभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा फटका बसत असल्याने अनेकांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील १५ वर्षांपासून मार्गी लावला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.पूर्व विदर्भातील जिल्ह्यात 'हरितक्रांती' व्हावी, यासाठी महत्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनी ओलीताखाली आल्याने शेतकऱ्यांसमोरील ओलीताचा प्रश्न मिटला आहे. प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी वरदान गोसेखुर्द प्रकल्प वरदान ठरले आहे. मात्र या प्रकल्पामुळे अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, अजुनही कारधा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे.सुमारे १५ वर्षांपासून कारधा गावाची पुनर्वसन प्रक्रिया रखडली असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा फटका कारधा गावाला बसत असल्याने पावसाळ्यात येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. गावाचे पुनर्वसन करण्याच्या नावावर प्रशासन गावकऱ्यांना केवळ आश्वासन देत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. प्रकल्पाचे पाणी गावात येत असल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घर जिर्णावस्थेत आहेत. पाण्याच्या फटक्यामुळे अनेक घर पडण्याच्या स्थितीत असतानाही गावाचे पुनर्वसनही होत नाही व त्यांना नविन घर बांधण्यासही विरोध होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची 'इकडे आड, तिकडे विहिर' अशी परिस्थिती झाली आहे. तिनशेच्यावर घरांचा प्रश्न असल्याने प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच शितला करंडी, अश्विन चौरे, शबाना खॉं पठाण, चंदा भुरे, कल्पना रेहपाडे व श्यामकला शिंदे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)