शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गोसेखुर्दच्या ‘बॅक वॉटर’चा फटका

By admin | Updated: October 8, 2014 23:20 IST

गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा

कारधावासीयांमध्ये रोष : पुनर्वसनाची प्रक्रिया १५ वर्षांपासून रखडलीभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा फटका बसत असल्याने अनेकांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील १५ वर्षांपासून मार्गी लावला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.पूर्व विदर्भातील जिल्ह्यात 'हरितक्रांती' व्हावी, यासाठी महत्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनी ओलीताखाली आल्याने शेतकऱ्यांसमोरील ओलीताचा प्रश्न मिटला आहे. प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी वरदान गोसेखुर्द प्रकल्प वरदान ठरले आहे. मात्र या प्रकल्पामुळे अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, अजुनही कारधा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे.सुमारे १५ वर्षांपासून कारधा गावाची पुनर्वसन प्रक्रिया रखडली असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा फटका कारधा गावाला बसत असल्याने पावसाळ्यात येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. गावाचे पुनर्वसन करण्याच्या नावावर प्रशासन गावकऱ्यांना केवळ आश्वासन देत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. प्रकल्पाचे पाणी गावात येत असल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घर जिर्णावस्थेत आहेत. पाण्याच्या फटक्यामुळे अनेक घर पडण्याच्या स्थितीत असतानाही गावाचे पुनर्वसनही होत नाही व त्यांना नविन घर बांधण्यासही विरोध होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची 'इकडे आड, तिकडे विहिर' अशी परिस्थिती झाली आहे. तिनशेच्यावर घरांचा प्रश्न असल्याने प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच शितला करंडी, अश्विन चौरे, शबाना खॉं पठाण, चंदा भुरे, कल्पना रेहपाडे व श्यामकला शिंदे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)