शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

By admin | Updated: May 22, 2017 00:51 IST

इंदिरा सागर महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी पाणी साठा कमी

धरणाची पातळी २३८ मीटरवर : नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक प्रकाश हातेल । लोकमत न्यूज नेटवर्क चिचाळ : इंदिरा सागर महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी पाणी साठा कमी करण्यात आले ते चार बोगद्याची कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. २२ एप्रिल १९८८ मध्ये गोसे धरणाची निर्मिती झाली. पायथ्याजवळ पाणी वाहुन जाण्याकरिता चार भुमिगत बोगद्याची ‘कडूळ’ निर्मिती करण्यात आली होती आज हे प्रकल्प पूर्णपणे तयार असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने सर्वत्र जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाचे २४२ मीटरचा दुसरा टप्पा अर्थात २० टीएमसी उद्दिष्ट पूर्ण केले गेले होते. या वर्षी त्यात वाढ करुन २४२.५०० मीटरपर्यंत जलसाठा साठविण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या गेट क्रमांक ८, ९ व १० वरील चार भुमिगत बोगदे बंद करावयाचे असल्याने धरणातील जलसाठा टप्प्याटप्प्याने कमी केले जात आहे. आजमितीला धरणातील पाण्याची पातळी २३८ मिटर आहे. तर धरणाचे ३३ वक्रद्वारे बंद केले असून आवश्यकतेनुसार पाणी ८ ते १० दिवसांनी पाणी सोडले जात आहे. व कंडूळ बोगद्याचे कामे वक्रद्वाराने पाणी अडवून बोगद्याचे काम केली जात असून मे महिन्याचे शेवटपर्यंत पूर्ण कामे होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. धरणाचा मुख्य कालवा, शाखा कालवा, वितरिका, लघु कालवा आदी कालव्याचे मुख्य कालव्यापासून साडे आठ किमी पर्यंतची कामे जुनपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे निदे्रश असल्याने कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या पॉवर हाऊसवचे कामे अंतिम टप्प्यात आली असून धरणाच्या पाळी शेजारी आली आहेत. त्या पॉवर हाऊसच्या कामासाठी पुन्हा पाण्याची पातळी कमी करण्यात येणार आहे. त्यावेळी पॉवर हाऊस व बोगद्यांची शिल्लक कामे पूर्ण केली जाणार आहेत. डिसेंबर २०१७ ला धरणाचे संचयन पातळी गाठणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू ४प्रकल्पाची कामे होताच पाणी अडविण्याची भुमिका शासनाने घेतली. नदी काठावरील प्रकल्प ग्रस्तांना गावे सोडावी लागली. मात्र आजमितीला धरण खाली केल्याने जुने गावाचे दर्शन झाले असून गावातील रस्ते, मंदिरे, चौकटी वरील वटवृक्ष, पडलेली घरे जुन्या आठवणी निर्माण करीत असून प्रकल्पग्रस्तांची डोळे पाणावली आहेत. ४धरणाचे कामे पूर्ण होताच शासनाने पाणी अडविण्याची भुमिका घेतली त्यामुळे ५० किमीपर्यंत नदी जलमय झाली होती. तेव्हापासून नागरिकांन नदीचे पात्र पाहिले नव्हते. मात्र आता धरणाचे पाणी कमी केल्याने नदीतील साचलेले घाण पाणी व नदीतील दुषीत पाणी वाहुन गेले आहे तर नागरिकांना वैनगंगेचे दर्शन झाले आहे.