शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

भूमिपूजनानंतर तब्बल ३४ वर्षांनी भरला गोसेखुर्द प्रकल्प; २४५.५० मीटर जलपातळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 20:41 IST

Bhandara News अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प निर्मितीनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला. मंगळवारी सकाळी या प्रकल्पाची जलपातळी २४५.५० मीटर नोंदविण्यात येऊन प्रकल्पात ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे.

ठळक मुद्दे ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला ‘इंदिरासागर जलाशय’ अर्थात गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प निर्मितीनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला. मंगळवारी सकाळी या प्रकल्पाची जलपातळी २४५.५० मीटर नोंदविण्यात आली. यावेळी प्रकल्पात ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या निर्धारित २२२.५८ वर्ग किलोमीटर बुडित क्षेत्राच्या बाहेरही बॅकवाॅटर शिरले आहे.

पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. २२ एप्रिल १९८८ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. २००९ पासून जलसाठा करण्यास प्रारंभ झाला. परंतु पुनर्वसनाचे काम अपूर्ण होते.

त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास अडचण येत होती. आता पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्याने १ नोव्हेंबर २०२१पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवार, ११ जानेवारी रोजी २४५.५० मीटर जलपातळी झाली आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे आता या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन होण्याची अपेक्षा आहे.

भंडारा जिल्ह्यातील ३४ गावे पूर्णत: बाधित

या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ३४ पूर्णत: तर अंशत: १०४ गावे, नागपूर जिल्ह्यातील ८५ गावे बाधित झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील १२ हजार ४७५ हेक्टरपैकी १२ हजार ३६१ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे, तर नागपूर जिल्ह्यातील ३३.३६ हेक्टरपैकी २७.६६ हेक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २६८२ हेक्टर जमिनीपैकी २ हजार ६३२ हेक्टर शेतजमीन संपादित झाली आहे.

अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता

तीन जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता अडीच लाख हेक्टर आहे. या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ८९ हजार ८५६ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ४८१ हेक्टर, तर चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाला दोन कालवे असून, डाव्या कालव्याची लांबी २३ किलोमीटर, तर उजव्या कालव्याची लांबी ९९ किलोमीटर आहे.

बॅकवाॅटरची समस्या वाढली

गोसेखुर्द प्रकल्पात १ नोव्हेंबरपासून पाणी साठविण्यास प्रारंभ झाला. हळूहळू पाण्याची पातळी वाढायला लागली आणि बॅकवाॅटरची समस्या निर्माण झाली. बुडित क्षेत्रातील अनेक गावांतील शेतजमिनीसह रस्त्यांवर पाणी शिरले आहे. भंडारा शहरातील काही वसाहतीमध्येही बॅकवाॅटर शिरले आहे. निर्धारित बुडित क्षेत्राबाहेर शिरलेल्या बॅकवाटरचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे केले जाणार आहे.

कालवा उशाशी पण शेतकरी उपाशी !

गाेसेखुर्द प्रकल्पाच्या डावा आणि उजवा कालव्याचे काम पूर्ण झाले असले तरी उपकालवे आणि पाटसऱ्यांचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे गाेसेखुर्दचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाेहाेचले नाही. डाव्या कालव्याची लांबी २३ किमी असून, ताे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात जाताे. उजवा कालवा ९९ किमीचा असून, पवनी, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्याला सिंचनाचा लाभ हाेणार आहे. कधी कंत्राटदाराचे अडथळे, कधी निधीची कमतरता अशा अनेक अडचणी या मार्गात आल्या आहेत. आता पूर्ण प्रकल्प भरला तरी उपकालवे आणि पाटसऱ्यांअभावी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहाेचण्याची शक्यता कमी आहे. लवकरच कालव्याचे काम पूर्ण हाेऊन शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पाेहाेचावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प