शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

‘गोसेखुर्द’ बळीराजांसाठी दिवास्वप्न

By admin | Updated: September 19, 2015 00:37 IST

महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे.

शेती सिंचनापासून वंचित : चंद्रपूरात जलपूजन तर भंडारात जलसंकटखेमराज डोये आसगाव (चौ.) महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे. शासनाने हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात. मात्र, त्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने हा प्रकल्प त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरला आहे.या धरणाचे उजवा व डावा कालव्याच्या पाळीचे काम पूर्ण आहे. या धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी शासनाने मागितलेल्या किंमतीत दिल्या. या प्रकल्पामुळे अनेक गावे व कुटुंब विस्तापित झालीत. याच उजव्या कालव्याच्या पाळीतून चंद्रपुर जिल्ह्यातील असोलामेंढा तलावाला मागील आठवड्यात गोसे धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदोत्सोव साजरा करण्यात येत आहे. परंतु, हा हरितक्रांतीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ज्या पवनी तालुक्यात बांधण्यात आला, तेथील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा एक थेंबही मिळाला नसल्याने शेकडो हेक्टरमधील पिके नष्ट होण्याचा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.पवनी व लाखांदूर या तालुक्यातील डाव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा होवून हमखास धानाचे पीक वाचू शकते. परंतु डाव्या कालव्यांना कुठेही गेट लावले नसल्यामुळे व पागोला उपसा सिंचन योजना कार्यान्वित न केल्यामुळे या धरणाच्या पाण्याचा फायदा भंडारा, लाखनी, तालुक्याला होवू शकत नाही. पर्यायाने येथील शेतीतील उभे पीक सिंचनाअभावी हातून जाण्याच्या मार्गावर आहे. डाव्या कालव्यात गोसे धरणाचे पाणी सोडले जात आहे. पंरतु, याचा २५ टक्केही लाभ पवनी, लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे ज्या तालुक्यात हे महाकाय धरण बांधले आहे. त्याच शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात पाणी पोहचले म्हणून तिकडे ‘जलपूजन’ तर प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवलेल्या तालुक्यातील शेतीवर ‘जलसंकट’ असा दुजाभाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांवर, ‘घरी अळ, अन् पाण्यासाठी लळ’ असा प्रसंग ओढवला आहे.