शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

‘गोसेखुर्द’ बळीराजांसाठी दिवास्वप्न

By admin | Updated: September 19, 2015 00:37 IST

महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे.

शेती सिंचनापासून वंचित : चंद्रपूरात जलपूजन तर भंडारात जलसंकटखेमराज डोये आसगाव (चौ.) महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे. शासनाने हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात. मात्र, त्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने हा प्रकल्प त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरला आहे.या धरणाचे उजवा व डावा कालव्याच्या पाळीचे काम पूर्ण आहे. या धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी शासनाने मागितलेल्या किंमतीत दिल्या. या प्रकल्पामुळे अनेक गावे व कुटुंब विस्तापित झालीत. याच उजव्या कालव्याच्या पाळीतून चंद्रपुर जिल्ह्यातील असोलामेंढा तलावाला मागील आठवड्यात गोसे धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदोत्सोव साजरा करण्यात येत आहे. परंतु, हा हरितक्रांतीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ज्या पवनी तालुक्यात बांधण्यात आला, तेथील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा एक थेंबही मिळाला नसल्याने शेकडो हेक्टरमधील पिके नष्ट होण्याचा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.पवनी व लाखांदूर या तालुक्यातील डाव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा होवून हमखास धानाचे पीक वाचू शकते. परंतु डाव्या कालव्यांना कुठेही गेट लावले नसल्यामुळे व पागोला उपसा सिंचन योजना कार्यान्वित न केल्यामुळे या धरणाच्या पाण्याचा फायदा भंडारा, लाखनी, तालुक्याला होवू शकत नाही. पर्यायाने येथील शेतीतील उभे पीक सिंचनाअभावी हातून जाण्याच्या मार्गावर आहे. डाव्या कालव्यात गोसे धरणाचे पाणी सोडले जात आहे. पंरतु, याचा २५ टक्केही लाभ पवनी, लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे ज्या तालुक्यात हे महाकाय धरण बांधले आहे. त्याच शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात पाणी पोहचले म्हणून तिकडे ‘जलपूजन’ तर प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवलेल्या तालुक्यातील शेतीवर ‘जलसंकट’ असा दुजाभाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांवर, ‘घरी अळ, अन् पाण्यासाठी लळ’ असा प्रसंग ओढवला आहे.