शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘गोसेखुर्द’ बळीराजांसाठी दिवास्वप्न

By admin | Updated: September 19, 2015 00:37 IST

महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे.

शेती सिंचनापासून वंचित : चंद्रपूरात जलपूजन तर भंडारात जलसंकटखेमराज डोये आसगाव (चौ.) महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे. शासनाने हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात. मात्र, त्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने हा प्रकल्प त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरला आहे.या धरणाचे उजवा व डावा कालव्याच्या पाळीचे काम पूर्ण आहे. या धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी शासनाने मागितलेल्या किंमतीत दिल्या. या प्रकल्पामुळे अनेक गावे व कुटुंब विस्तापित झालीत. याच उजव्या कालव्याच्या पाळीतून चंद्रपुर जिल्ह्यातील असोलामेंढा तलावाला मागील आठवड्यात गोसे धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदोत्सोव साजरा करण्यात येत आहे. परंतु, हा हरितक्रांतीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ज्या पवनी तालुक्यात बांधण्यात आला, तेथील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा एक थेंबही मिळाला नसल्याने शेकडो हेक्टरमधील पिके नष्ट होण्याचा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.पवनी व लाखांदूर या तालुक्यातील डाव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा होवून हमखास धानाचे पीक वाचू शकते. परंतु डाव्या कालव्यांना कुठेही गेट लावले नसल्यामुळे व पागोला उपसा सिंचन योजना कार्यान्वित न केल्यामुळे या धरणाच्या पाण्याचा फायदा भंडारा, लाखनी, तालुक्याला होवू शकत नाही. पर्यायाने येथील शेतीतील उभे पीक सिंचनाअभावी हातून जाण्याच्या मार्गावर आहे. डाव्या कालव्यात गोसे धरणाचे पाणी सोडले जात आहे. पंरतु, याचा २५ टक्केही लाभ पवनी, लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे ज्या तालुक्यात हे महाकाय धरण बांधले आहे. त्याच शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात पाणी पोहचले म्हणून तिकडे ‘जलपूजन’ तर प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवलेल्या तालुक्यातील शेतीवर ‘जलसंकट’ असा दुजाभाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांवर, ‘घरी अळ, अन् पाण्यासाठी लळ’ असा प्रसंग ओढवला आहे.