वेदना : दोन घास मिळविण्यासाठी जीव ठेवतात टांगणीला, शासनाच्या मदतीपासून कोसोदूरविशाल रणदिवे अड्याळजगाने आधुनिकतेचा आधार घेतला आहे. प्रगतीच्या दिशेने सर्वांनी पाऊले टाकली असतानही, वितभर पोटासाठी जीवावर बेदणाऱ्या कसरती करून त्यांना दारोदारी भटकंती करून पोटाची खडगी भरावी लागत आहे.समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा समान अधिकार मिळाला पाहिजे, त्यांच्या मूूलभूत गरजांची पुर्तता व्हावी, यासाठी शासनाने त्यांत्या उत्थानासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या असल्या तरी, गोपाळ समाज या योजनांपासून कोसोदूर आहे. हा समाज वस्ती करून राहू लागला असून त्यांच्या पोटाचा प्रश्न मात्र सुटलेला दिसत नाही. या समाजातील लोकांचा सकाळपासूनच लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत आपआपली कसरती करून जे मिळेल जसे अन्न मिळाले देण्याऱ्याला भगवान मानून त्याला मान देऊन आणि शिळ्या अन्नाचाही आदर करून आपल्या पोटाची भूक भागवताना हा समाज पाहायला दिसतो. स्वातंत्र्यांच्या ६० वर्षानंतरही या समाजाची पोटासाठी कसरती व गावोगावची भटकंती मात्र आजही कायम आहे.ही एक शोकांतिका आहे की आजही गोपाळ समाज दरवर्षी अड्याळ व परिसरात आपला परिवार घेऊन येतात वय वाढली काळही बदलला पण त्यांचा पोटासाठी होणारा खेळ मात्र आजही तोच. याला जबाबदार कोण? घरातल्या अठराविश्व दारिद्र्यात दोन वेळच्या भाकरीचा पत्ता नाही मग चोरी चापलुसी न करता कला कसरतीचे कर्तव्य दाखवून मिळेल ते अन्न धन, धान्यावर आपला व परिवाराचा पोटाचा प्रश्न मिळविणे यापलिकडे ते दिसत नाही. शासनाने या समाजासाठी योजना आणल्या. सोयी, सवलत सुविधा यांचा लाभ यांना किती प्रमाणात मिळत असेल हे गोपाळ समाजाच्या भटकंतीवरून दिसून येते. या समाजातील लहान मुलं खेळण्याच्या वयात दुसऱ्यांना खेळ दाखविण्यासाठी फिरतो आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कोण नेणार? शासन अनेक योजना राबवितो. कोट्यवधी रुपये खर्च करते. पण त्यांचा उपयोग काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
पोटाच्या खळगीसाठी गोपाळ समाजाची धडपड
By admin | Updated: June 2, 2015 00:33 IST