शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पोटाच्या खळगीसाठी गोपाळ समाजाची धडपड

By admin | Updated: June 2, 2015 00:33 IST

जगाने आधुनिकतेचा आधार घेतला आहे. प्रगतीच्या दिशेने सर्वांनी पाऊले टाकली असतानही, वितभर पोटासाठी जीवावर बेदणाऱ्या ..

वेदना : दोन घास मिळविण्यासाठी जीव ठेवतात टांगणीला, शासनाच्या मदतीपासून कोसोदूरविशाल रणदिवे अड्याळजगाने आधुनिकतेचा आधार घेतला आहे. प्रगतीच्या दिशेने सर्वांनी पाऊले टाकली असतानही, वितभर पोटासाठी जीवावर बेदणाऱ्या कसरती करून त्यांना दारोदारी भटकंती करून पोटाची खडगी भरावी लागत आहे.समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा समान अधिकार मिळाला पाहिजे, त्यांच्या मूूलभूत गरजांची पुर्तता व्हावी, यासाठी शासनाने त्यांत्या उत्थानासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या असल्या तरी, गोपाळ समाज या योजनांपासून कोसोदूर आहे. हा समाज वस्ती करून राहू लागला असून त्यांच्या पोटाचा प्रश्न मात्र सुटलेला दिसत नाही. या समाजातील लोकांचा सकाळपासूनच लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत आपआपली कसरती करून जे मिळेल जसे अन्न मिळाले देण्याऱ्याला भगवान मानून त्याला मान देऊन आणि शिळ्या अन्नाचाही आदर करून आपल्या पोटाची भूक भागवताना हा समाज पाहायला दिसतो. स्वातंत्र्यांच्या ६० वर्षानंतरही या समाजाची पोटासाठी कसरती व गावोगावची भटकंती मात्र आजही कायम आहे.ही एक शोकांतिका आहे की आजही गोपाळ समाज दरवर्षी अड्याळ व परिसरात आपला परिवार घेऊन येतात वय वाढली काळही बदलला पण त्यांचा पोटासाठी होणारा खेळ मात्र आजही तोच. याला जबाबदार कोण? घरातल्या अठराविश्व दारिद्र्यात दोन वेळच्या भाकरीचा पत्ता नाही मग चोरी चापलुसी न करता कला कसरतीचे कर्तव्य दाखवून मिळेल ते अन्न धन, धान्यावर आपला व परिवाराचा पोटाचा प्रश्न मिळविणे यापलिकडे ते दिसत नाही. शासनाने या समाजासाठी योजना आणल्या. सोयी, सवलत सुविधा यांचा लाभ यांना किती प्रमाणात मिळत असेल हे गोपाळ समाजाच्या भटकंतीवरून दिसून येते. या समाजातील लहान मुलं खेळण्याच्या वयात दुसऱ्यांना खेळ दाखविण्यासाठी फिरतो आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कोण नेणार? शासन अनेक योजना राबवितो. कोट्यवधी रुपये खर्च करते. पण त्यांचा उपयोग काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.