शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
3
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
4
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
5
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
6
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
7
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
8
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
9
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
10
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
11
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
13
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
14
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
15
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
16
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
17
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
18
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
19
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
20
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गोसेच्या अपूर्ण कालव्याने सिंचनाचे स्वप्न धुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : कालव्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा ?

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारा आणि राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनाची आस लावून बसलेले शेतकरी कालव्याचे काम पूर्ण केव्हा होणार असा प्रश्न करीत आहेत.पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे. या धरणाचा डावा कालवा ४२ किलोमीटरचा तर उजवा कालवा ११० किलोमीटरचा आहे.१९८८ सालापासून विविध दिव्यांना सामोरे जात या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. तर डाव्या कालव्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्यामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी मिळणार होते, परंतु ही समस्या सुटायला तयार नाही. मोहरना, खैरना, दोनाड, नांदेड, इटाण येथील शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. धान उत्पादक शेतकºयांना या भागातून गेलेल्या डाव्या कालव्याचे पाणी मिळत नाही. उलट सोडलेले पाणी सरळ चुलबंद नदीत वाहून जाते. याचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यासाठी पारी बनविण्यात याव्या, गेटची सुविधा करावी आदी मागण्या करण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. आणखी किती वर्ष या प्रकल्पातील पाण्याची प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न या भागातील शेतकरी करीत आहेत. धान उत्पादक शेतकºयांना या प्रकल्पापासून मोठी अपेक्षा आहे. परंतु विविध कारणाने प्रकल्पाचे पाणी मिळतच नाही.विविध समस्या कायमलोकप्रतिनिधी आणि शेतकºयांनी वारंवार गोसे प्रकल्प प्रशासनाला सिंचनासंदर्भात निवेदने दिलीत. परंतु या समस्यांचे निराकरण झाले नाही. लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील कालव्यांच्या विविध समस्या कायम आहेत. गेल्या दोन तीन वर्षात समस्या निकाली निघाल्या नाहीत. आणखी अनेक वर्ष सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागेल हे मात्र तेवढेच खरे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प