शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

गोसेच्या अपूर्ण कालव्याने सिंचनाचे स्वप्न धुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : कालव्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा ?

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारा आणि राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनाची आस लावून बसलेले शेतकरी कालव्याचे काम पूर्ण केव्हा होणार असा प्रश्न करीत आहेत.पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे. या धरणाचा डावा कालवा ४२ किलोमीटरचा तर उजवा कालवा ११० किलोमीटरचा आहे.१९८८ सालापासून विविध दिव्यांना सामोरे जात या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. तर डाव्या कालव्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्यामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी मिळणार होते, परंतु ही समस्या सुटायला तयार नाही. मोहरना, खैरना, दोनाड, नांदेड, इटाण येथील शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. धान उत्पादक शेतकºयांना या भागातून गेलेल्या डाव्या कालव्याचे पाणी मिळत नाही. उलट सोडलेले पाणी सरळ चुलबंद नदीत वाहून जाते. याचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यासाठी पारी बनविण्यात याव्या, गेटची सुविधा करावी आदी मागण्या करण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. आणखी किती वर्ष या प्रकल्पातील पाण्याची प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न या भागातील शेतकरी करीत आहेत. धान उत्पादक शेतकºयांना या प्रकल्पापासून मोठी अपेक्षा आहे. परंतु विविध कारणाने प्रकल्पाचे पाणी मिळतच नाही.विविध समस्या कायमलोकप्रतिनिधी आणि शेतकºयांनी वारंवार गोसे प्रकल्प प्रशासनाला सिंचनासंदर्भात निवेदने दिलीत. परंतु या समस्यांचे निराकरण झाले नाही. लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील कालव्यांच्या विविध समस्या कायम आहेत. गेल्या दोन तीन वर्षात समस्या निकाली निघाल्या नाहीत. आणखी अनेक वर्ष सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागेल हे मात्र तेवढेच खरे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प