शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

गोसेच्या अपूर्ण कालव्याने सिंचनाचे स्वप्न धुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : कालव्याचे काम पूर्ण होणार तरी केव्हा ?

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारा आणि राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनाची आस लावून बसलेले शेतकरी कालव्याचे काम पूर्ण केव्हा होणार असा प्रश्न करीत आहेत.पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या पाण्याचा मोठा फायदा होऊन समृद्धी येणार असल्याचे सांगितले जात आहे. या धरणाचा डावा कालवा ४२ किलोमीटरचा तर उजवा कालवा ११० किलोमीटरचा आहे.१९८८ सालापासून विविध दिव्यांना सामोरे जात या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. तर डाव्या कालव्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्यामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी मिळणार होते, परंतु ही समस्या सुटायला तयार नाही. मोहरना, खैरना, दोनाड, नांदेड, इटाण येथील शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. धान उत्पादक शेतकºयांना या भागातून गेलेल्या डाव्या कालव्याचे पाणी मिळत नाही. उलट सोडलेले पाणी सरळ चुलबंद नदीत वाहून जाते. याचा फायदा शेतकºयांना होत नाही. त्यासाठी पारी बनविण्यात याव्या, गेटची सुविधा करावी आदी मागण्या करण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. आणखी किती वर्ष या प्रकल्पातील पाण्याची प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न या भागातील शेतकरी करीत आहेत. धान उत्पादक शेतकºयांना या प्रकल्पापासून मोठी अपेक्षा आहे. परंतु विविध कारणाने प्रकल्पाचे पाणी मिळतच नाही.विविध समस्या कायमलोकप्रतिनिधी आणि शेतकºयांनी वारंवार गोसे प्रकल्प प्रशासनाला सिंचनासंदर्भात निवेदने दिलीत. परंतु या समस्यांचे निराकरण झाले नाही. लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील कालव्यांच्या विविध समस्या कायम आहेत. गेल्या दोन तीन वर्षात समस्या निकाली निघाल्या नाहीत. आणखी अनेक वर्ष सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागेल हे मात्र तेवढेच खरे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प