शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोसे प्रकल्पग्रस्तांचा वीज महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसे प्रकल्पग्रस्त पुर्णत: बाधीत अनेक गावांचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे. अशा ८५ गावांचे वीज बिल ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सरसकट माफ करण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या नागपूर आणि भंडारा येथील अधीक्षक अभियंत्यांनी सादर केला. ८ कोटींचा हा प्रस्ताव आहे. मात्र प्रस्ताव सादर केल्यानंतरही बाधीत गावात वीज पुरवठा खंडीत करण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले.

ठळक मुद्देवीज खंडित करण्याचे दिले होते पत्र ।

दोन तासाच्या आंदोलनानंतर कारवाई थांबलीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पबाधीत गावातील वीज पुरवठा खंडीत करण्याचे पत्र वीज वितरण कंपनीने पाठविताच संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वीज वितरण कंपनी खडबडून जागी होत वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले.भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसे प्रकल्पग्रस्त पुर्णत: बाधीत अनेक गावांचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे. अशा ८५ गावांचे वीज बिल ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सरसकट माफ करण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या नागपूर आणि भंडारा येथील अधीक्षक अभियंत्यांनी सादर केला. ८ कोटींचा हा प्रस्ताव आहे. मात्र प्रस्ताव सादर केल्यानंतरही बाधीत गावात वीज पुरवठा खंडीत करण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले.यामुळे प्रकल्पबाधीत नागरिक संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी भंडारा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. आपल्या मागण्या तिथे मांडल्या. यावर वीज वितरण प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आणि पत्र वाटप न करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांसह ३४ गावचे नागरिक उपस्थित होते. तब्बल दोन तास ठिय्या दिल्यानंतर आंदोलकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.गोसे प्रकल्पाला २६ फेब्रुवारी २००९ ला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. आता त्याला १८ वर्ष पूर्ण होत आहे. मात्र त्यानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या कायम आहे. प्रकल्पग्रस्त आणि त्याच्या प्रत्यक अपत्यास कृषी मजुरीची एकमुस्त रक्कम देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रस्ताव शासनास सादर केला आहे. अनेक गावांचे पूर्णत: पुनर्वसन होणे बाकी असून यामुळे प्रकल्पग्रस्तांना त्रास होतो.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पmahavitaranमहावितरण